शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

सांबारवडी महागच; सर्वच भाज्या ५० रुपयांवर, पावसामुळे भाज्या शेतातच खराब

By मोरेश्वर मानापुरे | Published: December 27, 2023 7:57 PM

नोव्हेंबर महिन्यात केवळ दोन ते तीन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे ६० टक्के भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत.

नागपूर : हिवाळ्यात भाजीपाला आणि पालेभाज्या स्वस्त असतात. या दिवसात वैदर्भीय सांबारवडीचा पाहुणचार सर्वच घरी असतो. पण यंदा कोथिंबीरचे भाव १२० रुपयांवर पोहोचल्याने अनेकांनी सांबारवडीचा बेत रद्द केला आहे. सर्वच भाज्यांचे भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. 

नोव्हेंबर महिन्यात केवळ दोन ते तीन दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे ६० टक्के भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी असून भाज्यांचा दर्जाही निकृष्ट आहे. परिणामी गृहिणींना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत भाज्या जास्त दरातच खरेदी कराव्या लागतील. सध्या स्थानिक उत्पादक शेतकरी आणि अन्य जिल्ह्यातून भाज्या विक्रीला येत आहे. हिवाळ्यात १५० हून अधिक गाड्यांची होणारी आवक ६० ते ७० गाड्यांपर्यंत कमी झाल्याची माहिती कॉटन मार्केट भाजीपाला अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.

दरवर्षी हिवाळ्यात रस्त्यावर फेकाव्या लागतात पालेभाज्या

हिवाळ्यात भाजीपाला आणि पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. दरवर्षी ५ ते १० रुपये किलो मिळणारे वांगे, पालक, मेथी आणि फूल कोबीचे दर यंदा ७० रुपये किलोवर पोहोचले आहेत. वाहतूक खर्च आणि अडतियांची दलाली परवडत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी दरवर्षी रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री करतात आणि उरलेला माल जागेवरच सोडून गावाकडे परतात. पण यंदा अशी परिस्थिती नाही. सर्वच माल बाजारपेठांमध्ये विकला जात आहे.

स्थानिकांसह नांदेड, नाशिकहून आवकस्थानिकांसह नांदेड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक आहे. टोमॅटो आणि पत्ता कोबी वगळता सर्वच भाज्यांचे भाव प्रति किलो ५० रुपयांवर गेल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट वाढले आहे. 

कांदे वाढले; बटाटे आटोक्यातनोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. कळमना बाजारात लाल कांद्याची आवक औरंगाबाद, नगर आणि सोलापूर येथून असून पांढरे कांदे गुजरातेतून येत आहेत. सध्या २० ते २५ ट्रकची आवक आहे. कळमन्यात दर्जानुसार २५ रुपये किलोपर्यंत भाव आहेत, तर किरकोळमध्ये ४० ते ४५ रुपये दराने विक्री होत आहे. बटाट्याचे १० ते १५ ट्रक आग्रा आणि कानपूर येथून येत आहेत. किरकोळमध्ये प्रति किलो भाव २५ ते ३० रुपये आहे. शिवाय यंदा लसणाचे भाव आकाशाला भिडले आहेत. कळमन्यात दर्जानुसार २५० ते ३०० रुपये तर किरकोळमध्ये भाव ४०० रुपयांवर पोहोचले आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेशातून दररोज दोन ट्रक विक्रीस येत आहेत.

ठोक आणि किरकोळमध्ये भाज्यांचे भाव (रुपये, प्रति किलो) :भाज्या ठोक किरकोळवांगे ५० ७०-८०हिरवी मिरची २५-३० ४०-५०टोमॅटो १२-१५ २५-३०कोथिंबीर ७०-८० ११०-१२०फूल कोबी ३०-४० ५०-६०पत्ता कोबी १२-१५ २०-२५सिमला मिरची ५० ७०-८०कारले ५० ७०-८०हिरवा मटर २५-३० ४०-५०भेंडी ६० ८०-९०चवळी शेंग ७० ९०-१००ढेमस ६० ८०-९०कोहळे २० ३०-४०लवकी १५ २५-३०फणस४० ६०-७०पालक ३० ४०-५०मेथी ५० ७०-८०

टॅग्स :nagpurनागपूर