शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

संवेदनशील आणि मने जुळणाऱ्या थोड्या लेखकांमध्ये आशा बगे अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 9:02 PM

Nagpur News महाराष्ट्रात संवेदनशील आणि मने जुळणारे लेखन फार कमी झाले आहे आणि ज्यांनी असे लेखन केले, त्यात सर्वांत अग्रस्थानी ज्यांचे नाव घ्यायला हवे, त्या आशा बगे असल्याची भावना ज्येष्ठ संपादक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्दे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आशा बगे यांचा सत्कार

नागपूर : महाराष्ट्रात संवेदनशील आणि मने जुळणारे लेखन फार कमी झाले आहे आणि ज्यांनी असे लेखन केले, त्यात सर्वांत अग्रस्थानी ज्यांचे नाव घ्यायला हवे, त्या आशा बगे असल्याची भावना ज्येष्ठ संपादक व विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.

ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जनस्थान पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारानिमित्त विदर्भ गौरव प्रतिष्ठान व आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते, तर व्यासपीठावर हेमंत काळीकर, डॉ. अविनाश रोडे, बाळ कुळकर्णी, नीलेश खांडेकर उपस्थित होते.

आशा बगे यांनी पारंपरिकता जपतानाच आधुनिकेतची कास कधीच सोडली नाही. स्वभावाची सात्त्विक, सोज्वळ छाप असलेल्या त्यांच्या लिखाणामध्ये अतिशय समर्पकरीत्या पारंपरिकतेची आधुनिकतेची सांगड घातल्याचे दिसून येते, अशा शब्दांत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी भावना व्यक्त केल्या.

आशाताईंना साहित्य अकादमीनंतर जनस्थान पुरस्कार मिळणे, ही केवळ नागपूरच नाही तर विदर्भाच्या साहित्यिक विश्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे डॉ. गिरीश गांधी अध्यक्षस्थानाहून म्हणाले.

सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले, तर आभार बाळ कुळकर्णी यांनी मानले. प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, डॉ. कुमार शास्त्री, सुनीती देव यांच्यासह साहित्य व सामाजिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

लेखिकाच मागे का? - आशा बगे

- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराच्या गेल्या १७ वर्षांच्या काळात केवळ दोन-तीन लेखिकांनाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही लेखिकांना नगण्य स्थान मिळाले आहे. हे असे का? की लेखिकांची दखल घेतली जात नाही? असे प्रश्न आशा बगे यांनी सत्काराला उत्तर देताना यावेळी उपस्थित केले.

 

................

टॅग्स :literatureसाहित्य