शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

आर्थिक चक्रात अडकली ‘अमृत’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 7:00 AM

Nagpur news मनपा आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २४ बाय ७ योजनेसाठी ७८ कोटी तर १० जलकुंभांच्या बांधकामासाठी ७२.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आर्थिक स्थिती विचारात घेता या खर्चाला मंजुरी नसल्याने अमृत योजना आर्थिक चक्रात अडकण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात घोषणा पण निधी उपलब्ध नाही११७ कि.मी. पाईपलाईन बदलण्याचे काम ठप्पच

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारच्या अटल मिशन फॉर रिज्युव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेतून मनपाला ऑक्टोबर २०१६ मध्ये २२६ कोटींचा निधी मंजूर झाला होता. यातून २४ बाय ७ योजना संपूर्ण शहरात राबविणे व लोकसंख्येनुसार जलकुंभांची निर्मिती अशी कामे अजूनही पूर्ण झालेली नाही. मनपा आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २४ बाय ७ योजनेसाठी ७८ कोटी तर १० जलकुंभांच्या बांधकामासाठी ७२.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आर्थिक स्थिती विचारात घेता या खर्चाला मंजुरी नसल्याने अमृत योजना आर्थिक चक्रात अडकण्याची शक्यता आहे.

शहरातील पाणी गळती रोखणे व ३० टक्के पाईपलाईन बदलण्याचे काम करणे अपेक्षित होते. लाइन बदलण्याचे काम पूर्ण झाले. परंतु गळती थांबलेली नाही. नागपूर शहरात २०११-१२ या वर्षापासून २७ बाय ७ योजना राबविली जात आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. अर्धा शहरात यासाठी पाईपलाईन बदलण्यात आल्या. परंतु या भागात २४ तास पाणी मिळत नाही. नागपूर शहराला दररोज ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. यात मोठ्या प्रमाणात गळती आहे. योजना पूर्ण झाली तर गळती रोखण्यात यश येईल. असा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. याचा विचार करता संपूर्ण शहरात योजना राबविण्यासाठी आयुक्तांनी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ७८ कोटींची तरतूद केली आहे. मात्र आर्थिक स्थिती बघता हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे.

पाईपलाईन व जलकुंभासाठी ७२.५० कोटी

मनपा क्षेत्रातील अधिकृत, अनधिकृत, स्लम भागात पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचे विस्तारीकरण करण्याची गरज आहे. सुधारित प्रस्तावानुसार १७ जलकुंभ व ३७७ कि.मी. लांबीची पाईपलाईन प्रस्तावित आहे. यातील ११७ कि.मी. लाईन अजूनही शिल्लक आहे. १० जलकुंभांची कामे झालेली नाहीत. यासाठी आयुक्तांच्या अर्थसंकल्पात ७२.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या खर्चाला मंजुरी मिळालेली नाही.

अर्थसंकल्प म्हणजे कागदी घोडे

आयुक्तांच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा योजनेसाठी १५०.५० कोटींची तरतूद केली आहे. परंतु तरतूद असलेले शीर्षक अद्याप सुरू केलेले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातील आकडे हे कागदी घोडे आहेत. प्रत्यक्षात कामे करावयाची असल्यास यासाठी निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. तरतूद करायची पण निधी द्यायचा नाही. यातून विकासकामे कशी होणार?

- विजय झलके, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

टॅग्स :Waterपाणी