शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सततचा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2022 4:48 PM

अंबाडा येथील घटना

जलालखेडा (नागपूर) : सततचा मुसळधार पाऊस, तीनदा केलेली पेरणी, पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि वाढते कर्जबाजारपण यामुळे चिंतित असलेल्या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:च्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा येथे शनिवारी (दि. ३) मध्यरात्री घडली.

विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. यावर्षी सततच्या मुसळधार व अतिरिक्त पावसामुळे त्यांना तीनदा पेरणी करावी लागली. एवढे करूनही पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांची अवस्था वाईट असल्याने समाधानकारक उत्पादन हाेण्याची शक्यता मावळली आहे. त्यांच्याकडे बॅंकेचे पीककर्ज असून, कर्जाच्या परतफेडीची चिंता त्यांना भेडसावत हाेती. शिवाय, सरकारने आर्थिक मदतीही दिली नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

त्यांच्या पत्नीला शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाेपेतून जाग आली असता, त्यांना ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आरडाओरड करताच मुलगा कैलास व शेजाऱ्यांना जाग आली. माहिती मिळताच पाेलिसांनी मध्यरात्री घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

नरखेड तालुक्यात आत्महत्यांचे सत्र

नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. वर्षभरात तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वेगवेगळ्या मार्गाने स्वत:ला संपवत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी वेळीच याेग्य उपाययाेजना करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू