शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

आणि माणसाची सावली दिसेनाशी झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:48 IST

अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ उपराजधानीची स्थिती अनुकूल होती.

ठळक मुद्देनागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस : पृथ्वीचा कोन साडे २३ अंश कलल्याने ही स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ उपराजधानीची स्थिती अनुकूल होती.सूर्य डोक्यावर येतो किंवा आला असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात दोन दिवस वगळता सूर्य कधीच आपल्या डोक्यावर येत नाही, थोडा ना थोडा तो तिरपा असतोच. तो प्रत्यक्ष डोक्यावर येण्याचे दोन दिवस म्हणजे २६ मे आणि १७ जुलै. याचे शास्त्रीय कारणही तसे महत्त्वाचे आहे. रमण विज्ञान केंद्राचे शिक्षक विलास चौधरी यांनी झिरो शॅडो डे चे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. आकाशातून सूर्याचे भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असते ज्याला उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना साडेतेवीस अशाचा कोन करीत असते. ज्या दिवशी, ज्या वेळी हा कोन होतो त्या वेळी शून्य सावली दिवस येतो. मजेशीर बाब म्हणजे हा सर्वत्र सारखा नसतो तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात असतो.रमण विज्ञान केंद्र दरवर्षी झिरो शॅडो दे चे मार्गदर्शक आयोजन करीत असतो मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही.नागपुरातच सावली का गायब झाली ?तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की नागपुरात शून्य सावली का झाली. उत्तर आहे... विलास चौधरी यांनी सांगितले, नागपूर शहराचा अक्षांश २१.१७ अंश आहे. सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट उत्तरायण किंवा दक्षिणायन करताना २१.१७ अंश असतो तेव्हा नागपुरात सूर्य डोक्यावर येतो. म्हणजेच दुपारी १२.१० वाजता सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट २१.१० अंश असल्याने आज शून्य सावली दिवस अनुभवता आला.११५० लोकांनी पाहिले फेसबुक लाईव्हलॉकडाऊन लक्षात घेता रमण विज्ञान केंद्रातर्फे केंद्राच्या फेसबुक पेजवर शून्य सावली दिवस लाईव्ह करण्यात आला. मंगळवारी आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल ११५० च्यावर लोकांनी या क्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. केंद्रात यासाठी व्यवस्था व्यवसथा करण्यात आली होती आणि यावेळी काही लोक उपस्थित होते.

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवसnagpurनागपूर