शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वरुप वेगळे, परंतु सर्वांचे मूळ एकच; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 12:15 IST

nagpur news लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधार्मिय संमेलनाचे आयोजन ही सकारात्मक बाब आहे. धर्म जोणारा व प्रगतीकडे नेणारा असतो. परंतु मनुष्याची बुद्धी नकारात्मक असली तर त्याचा उपयोग करून लोक समाजाला तोडण्याचे काम करतात, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या.

नागपूर; लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधार्मिय संमेलनाचे आयोजन ही सकारात्मक बाब आहे. वैविध्याला एकतेचे पोषण मिळते. स्वरुप वेगळे असले तरी सर्वांचे मूळ एकच असल्याचा विसर पडतो व त्यातूनच विद्वेष निर्माण होतो. आपण एकच आहोत याचे स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या.

 ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेच्या सुरुवातीला सरसंघचालक मोहन भागवत यांनी चित्रफितीच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा दिल्या.  (Appearance different, but all have the same origin; Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat)

 ते पुढे म्हणाले, मनुष्य धर्माला जगाला एकमेकांपासून तोडण्याचे शस्त्र बनवितो व चारित्र्यापासून खाली पाडतो. एकमेकांसमवेत परस्पर संवाद नसल्याने असे होते. विविधता हा जगाचा अलंकार असल्याचा भारताचा विचार आहे. वैविध्याला एकतेचे पोषण मिळते. स्वरुप वेगळे असले तरी सर्वांचे मूळ एकच असल्याचा विसर पडतो व त्यातूनच विद्वेष निर्माण होतो. आपण एकच आहोत याचे स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे. लोकमतच्या माध्यमातून हा संवाद सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. सार्थक उद्दीष्ट व सकारात्मकतेकडे नेणारी दिशा मिळेल असा विश्वास असल्याचे मत डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदMohan Bhagwatमोहन भागवत