शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
5
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
6
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
7
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
8
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
9
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
10
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
11
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
12
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
13
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
14
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
16
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
17
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
18
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
19
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
20
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन मोदींच्या स्मरणातही नाही

By admin | Published: May 16, 2017 2:26 AM

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथे २० मार्च २०१४ ला ‘चाय पे चर्चा’वर शेतकऱ्यांशी संवाद साधला...

शिवाजीराव मोघे : १८ व १९ ला शेतकऱ्यांचे दिल्लीत उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथे २० मार्च २०१४ ला ‘चाय पे चर्चा’वर शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांची वाईट अवस्था सुधारण्यासाठी विविध योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. भाजपा सरकारला तीन वर्षे लोटूनही एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पंतप्रधान मोदींच्या स्मरणातही नाही. त्यांना त्याची आठवण देण्यासाठी येत्या १८ व १९ ला दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकरी उपोषण करणार असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिलीत आणि लोकांची भरभरून मतेही मिळविली. शेतकऱ्यांच्या मालाला नफ्याच्यावर ५० टक्के हमीभाव, शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना राष्ट्रीयकृत बँकाकडून अल्पव्याजदरात कर्ज, कापूस होत असलेल्या यवतमाळ, अमरावती भागात त्यावरील उद्योग, कृषिमालाच्या दळवणवळणासाठी स्वतंत्र रेल्वेची सुविधा, कृषिमाल साठविण्यासाठी खेड्यापाड्यात गोडाऊन, नद्या जोड प्रकल्प अशी एक ना अनेक आश्वासने त्यांनी दिली. शेतकरी आत्महत्या मागच्या सरकारचे पाप असल्याची टीका करून यापुढे कुणीही आत्महत्या करणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी दिला होता. मात्र तीन वर्षे लोटूनही मोदींनी एकाही आश्वासनाची पूर्ती केली नसल्याचा आरोप मोघे यांनी यावेळी केला. केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या काळात महाराष्ट्रात हजारो आत्महत्या झाल्या असून शेतकऱ्यांची अवस्था आणखी वाईट झाली आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेल्या देशातील ३३ जिल्ह्यातच आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात फडणवीस सरकारने ‘काँग्रेसचे धरण’ म्हणून निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे सहा लाख हेक्टर शेती सिंचनापासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.पंतप्रधानांना आठवण देण्यासाठी आर्णी तालुका काँग्रेस कमिटी व आर्णी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे गेली दोन वर्षे दाभडी व आर्णी येथे प्रतिकात्मक चाय की चर्चा हे आंदोलन केले. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने आता थेट दिल्लीतच आंदोलन घेण्यात येत असल्याचे मोघे यांनी सांगितले. जवळपास २०० शेतकरी या लाक्षणिक उपोषण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.भाजपाची संवाद यात्रा ‘बकवास’भाजपातर्फे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी राज्यात लवकरच संवाद यात्रा काढली जाणार आहे. याविषयी विचारले असता शिवाजीराव मोघे यांनी भाजपाची संवाद यात्रा ‘बकवास’ असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे हेच या यात्रेचे नेतृत्व करणार असल्याने या सरकारची मानसिकता स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली. आश्वासन पूर्ण करण्यात आणि शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने लोकांचे मन वळविण्यासाठी ही यात्रा काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.