शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

स्वातंत्र्यापूर्वीची जमीन बळकावण्याचा प्रयत्न

By admin | Published: May 18, 2017 2:27 AM

स्वातंत्र्यापूर्वी पारसी समाजाला मिळालेली ५०० कोटी रुपये किमतीची जागाही भूमाफिया ग्वालबन्सी टोळीने बोगस दस्तऐवजाच्या मदतीने

भूमाफिया ग्वालबन्सी टोळीचा प्रताप : ५०० कोटीची जमीन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्यापूर्वी पारसी समाजाला मिळालेली ५०० कोटी रुपये किमतीची जागाही भूमाफिया ग्वालबन्सी टोळीने बोगस दस्तऐवजाच्या मदतीने बळकावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रकार पारसी समुदायाच्या लगेच लक्षात आल्याने ग्वालबन्सी टोळीची डाळ शिजू शकली नाही. काटोल रोड सीपीडब्ल्यूडी कॉलनीजवळ पारसी समाजाची १७.५० एकर जागा आहे. या जागेवर पारसी समाजाची सेमिनरी आहे. १९११ मध्ये नागपूरचे तत्कालीन राजे रघुजी भोसले यांनी पारसी ट्रस्टला ९९ वर्षाच्या लीजवर ही जागा वितरित केली होती. स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्र सरकारने या लीजचे नुतनीकरण करून २०१० पर्यंत केले. ग्वालबन्सी टोळीने बोगस दस्तऐवजच्या मदतीने ही जमीन १९०९ मध्ये त्यांच्या वडिलांची असल्याचे सांगितले होते. त्यांचे म्हणणे होते की, रघुजी राजांनी ही जमीन पारसी ट्रस्टला वितरित करणे गैरकायदेशीर होते. राजांनी घेतलेला हा निर्णय असल्याने त्याला आव्हान देता आले नाही. परंतु त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा लीजचे नुतनीकरण केले. ट्रस्टला मिळालेली ही जमीन १९०९ पासून त्यांच्या कुटुंबाची असल्याचा त्यांचा दावा होता. लीजचे नुतनीकरण थांबवून ही जमीन बळकावण्याचा ग्वालबन्सी टोळीचा प्रयत्न होता. या उद्देशाने ग्वालबन्सी आपल्या भरवशाच्या अधिकाऱ्यांसोबत पुणे येथील भूमी अभिलेख कार्यालयात पोहचले. या दिशेने प्रयत्न करण्यासाठी ते सक्रिय झाले. या दरम्यान ट्रस्टचे प्रमुख पारसी जाल यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने पाऊल उचलित भूमी अभिलेखसह सर्वांना नोटीस पाठविल्या. असे करताच ग्वालबन्सी बंधू आणि भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी माघार घेतली. या जमिनीची सध्या ५०० कोटी रुपये इतकी किंमत आहे. ग्वालबन्सी टोळीने ही जमीन बळकावण्यासाठी स्वातंत्र्यपूर्वीचे दस्तऐवजही तयार केले होते. आता पोलीस आपल्या दारी भूमाफिया ग्वालबन्सी टोळीद्वारे फसविल्या गेलेल्या पीडितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आता अशा लोकांच्या घरी स्वत:च पोहोचत आहे. शहर पोलिसांनी पहिल्यांदाच या प्रकारचे पाऊल उचल्४ाले आहे. शहर पोलिसांनी ग्वालबन्सी टोळीशी संबंधित असलेल्यांच्या घरातून व कार्यालयातून सदस्यांकडून विक्रीपत्र जप्त केले आहे. पोलीस आठवडाभरापासून या विक्रीपत्रांचा तपास करीत होते. या दरम्यान ६० पेक्षा अधिक लोकांची माहिती पुढे आली. पोलिसांनी बुधवारपासून संबंधित लोकांकडे अधिकाऱ्यांना पाठविले. आज कळमेश्वर परिसरातील १७ लोकांशी संपर्क साधण्यात आला. विक्रीपत्राबाबत काही तक्रार आहे का, अशी विचारणा करण्यात आली. तक्रार असल्या कार्यालयात बोलावण्यात आले. असल्यास त्यांच्याकडून माहितीपत्र लिहून घेण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी ५० लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी दिलीप ग्वालबन्सीला बुधवारी न्यायालयात सादर करून २० मेपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.