शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 3:26 AM

रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. 

नागपूर : आज भारतात जात, भाषा, प्रदेश इत्यादींच्या आधारे समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पंजाब, जम्मू-काश्मीर, लद्दाख, केरळ, तामिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे, असे सांगत देशात जातीपातीच्या आधारावर निर्माण होत असलेले भेद व त्या माध्यमातून अराजकता पसरविण्याच्या प्रयत्नांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली. रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. 

संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्षे पूर्ण झाले असून, संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. यावेळी डॉ. भागवत म्हणाले, देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ होत आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे  लोकशाही मार्ग आहेत. 

भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे, असेही डॉ. भागवत यावेळी म्हणाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला ‘अराजकते’चे असे म्हटले आहे, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले. पावसामुळे मैदानात चिखल झाला होता. त्यामध्येही स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.  कार्यक्रमाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी होते. 

गडकरी, फडणवीस संघाच्या गणवेशातकार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या गणवेशात उपस्थित होते. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते.

सरसंघचालक म्हणाले...-जगात भारताचा दबदबा वाढला. मात्र, काही तत्त्व अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहेत.-बांगलादेशमधील हिंदूंवर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत. तोपर्यंत हिंदूंसोबत अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे.  -विशिष्ट घटकांच्या असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजापासून वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जात आहे. देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे.-कोलकाता अत्याचारानंतर गुन्हेगारांच्या संरक्षणासाठी काही लोकांकडून जे घृणास्पद प्रयत्न केले गेले त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि दुष्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हेच दिसून येते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ