शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

नागपूर रेल्वेस्थानकाला घातला ऑटोचालकांनी विळखा :वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:04 IST

रेल्वेस्थानकाच्या परिसरात नेहमीच वर्दळ राहते. २४ तास प्रवाशांची ये-जा सुरू असते. परंतु रेल्वेस्थानकाच्या सर्वच रस्त्याला ऑटोचालकांनी विळखा घातल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑटोचालकांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देभर रस्त्यात आडवे लावतात ऑटो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानकाच्या परिसरात नेहमीच वर्दळ राहते. २४ तास प्रवाशांची ये-जा सुरू असते. परंतु रेल्वेस्थानकाच्या सर्वच रस्त्याला ऑटोचालकांनी विळखा घातल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑटोचालकांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १३५ ते १४५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. प्रवाशांची संख्याही ३५ ते ४० हजार असते. परंतु रेल्वेस्थानकावर पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात आणि पश्चिमेकडील भागात ऑटोचालकांनी रेल्वेस्थानकाला विळखा घातल्याची स्थिती आहे. यात ऑटोचालक भर रस्त्यात आपली वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. प्रवाशांना आतमध्ये जाताना आणि बाहेर पडताना जागा उरत नाही. प्रवाशी घेण्यासाठी हे ऑटोचालक रस्त्यात ऑटो उभे करून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवासी शोधण्यासाठी जातात. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन रेल्वेस्थानकाच्या आत येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यांना आतमध्ये जाताना आणि बाहेर पडताना त्रास होतो. या भागात नेहमीच वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्त्यावरील ऑटोचालक, दुकानदार आदीविरुद्ध कारवाई करण्यात येते. परंतु पोलिसांचे वाहन निघून गेले की पुन्हा हे अतिक्रमण जैसे थे सुरू होते. त्यामुळे या परिसरातील ऑटोचालकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.मुख्य रस्त्यावर अतिक्रमणरेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी पश्चिमेकडील भागात दोन रस्ते आहेत. यात आरएमएस बिल्डिंग शेजारच्या रस्त्यावर ऑटोचालक दोन्ही बाजूंनी ऑटो उभे करतात. याशिवाय घड्याळ, मोबाईल कव्हर विक्रेते, पानटपरीवाले हे या रस्त्याच्या बाजूलाच उभे राहत असल्यामुुळे प्रवाशांना आत प्रवेश करताना जागा उरत नाहीत. त्यानंतर रेल्वेस्थानकाच्या वाहतूक बूथच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर तर ऑटोचालक ऑटो उभे करून हा रस्ताच बंद करून टाकत असल्याची स्थिती आहे. कार पार्किंगच्या शेजारी रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूलाही ऑटोचालक ऑटो उभे करून हा रस्ता बंद करून टाकतात.मेन गेटमध्ये उभे राहतात ऑटोचालकरेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात प्रवाशांना प्रवेश करण्यासाठी असलेल्या मेन गेटचा ताबाही ऑटोचालकांनी घेतला आहे. या गेटच्या आतमध्ये आणि बाहेर ऑटोचालक प्रवाशी घेण्यासाठी उभे राहतात. त्यामुळे प्रवाशांना आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागा उरत नसल्याची स्थिती आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने ऑटोचालकांवर कारवाई होताना दिसत नसल्यामुळे ऑटोचालकांचे चांगलेच फावत आहे.संत्रा मार्केट परिसरातही वाहतुकीचा खोळंबानागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरातही ऑटोचालकांनी अतिक्रमण केले आहे. या भागात प्रवेश करण्यासाठी असलेल्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर ऑटोचालक ऑटो उभे करीत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर ऑटो उभे राहत असल्यामुळे प्रवाशांना घाईगडबडीत रेल्वे पकडण्यासाठी जाताना त्रास होत आहे. त्यामुळे या भागात वाहतूक विस्कळीत करणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.वाहतूक पोलिसांशी चर्चा करणार‘रेल्वेस्थानकाच्या आत जाण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या रस्त्यांवर ऑटोचालकांनी अतिक्रमण केल्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर ऑटो उभे करणाऱ्या ऑटोचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस उपायुक्तांना भेटून चर्चा करणार आहोत.’भवानी शंकर नाथ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर