शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

सोशल मीडियावर अफवा टाळा, सामाजिक सौहार्द जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 07:00 IST

Nagpur News सोशल मीडियावर अफवा टाळण्यात याव्या, असे आवाहन ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले आहे.

नागपूर : राज्यातील काही शहरांमध्ये हिंसाचार झाल्यानंतर त्याचे मूळ कारण सोशल मीडियावरील अफवा असल्याचे दावे यंत्रणांकडून करण्यात येत आहेत. ‘सोशल मीडिया’वरील अफवांवर तसेच ‘फेक न्यूज’वर सुरक्षायंत्रणांकडून बारीक नजर ठेवण्यात येत असून नागरिकांनीदेखील अशा घटनांना बळी पडण्याची आवश्यकता नाही. अजाणतेपणाने केलेली एखादी फॉरवर्डेड पोस्ट संबंधित व्यक्तीसोबतच समाजालादेखील नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर अफवा टाळण्यात याव्या, असे आवाहन ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले आहे.

अमरावतीत हिंसेच्या घटनेनंतर काही दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. नागपुरातदेखील जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ‘सोशल मीडिया’वर पसरवणाऱ्या अफवांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. परंतु काही ‘प्लॅटफॉर्म’वरील अशा घटनांवर वचक ठेवणे कठीण आहे. ‘सोशल मीडिया’वर मस्करी म्हणून अफवा पसरवणारे मॅसेज, व्हिडिओ आणि फोटो फॉरवर्ड हिंसाचारालादेखील खतपाणी घालणारे ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनीच विशेष खबरदारी घेऊन सामाजिक सौहार्द जपण्यात मौलिक भूमिका पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी

विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांचे नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. एखाद्या परिचिताने पाठविले म्हणून ते इतरांकडूनदेखील समोर ‘फॉरवर्ड’ होते. असे प्रकार दररोज घडत असतात. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो. २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व नागपूर पोलिसांनी एकूण १६ प्रकरणात गुन्हे दाखल केले. ‘सोशल मीडिया’वर वाऱ्याच्या गतीने अफवा पसरवणाऱ्यांना सध्या कायद्याचा धाक नाही. पोलिसांनी यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची मदत घ्यावी व अशा मनोवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे मत पारसे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Fake Newsफेक न्यूज