शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

बालदिनाची गंमतच न्यारी...

By admin | Published: November 14, 2014 12:49 AM

बालदिन म्हटले की क्या कहने! घराघरातील चिंटू, पिंटू अन् बच्चे कंपनीच्या उत्साहाला पारावार उरत नाही. काळ बदलल्यावर पिढीदेखील बदलते, असे म्हणतात. कालच्या पिढीला क्वचितच

बच्चे कंपनीमध्ये उत्साह कायम : पारंपरिक समारंभांना आधुनिकतेचा साजनागपूर : बालदिन म्हटले की क्या कहने! घराघरातील चिंटू, पिंटू अन् बच्चे कंपनीच्या उत्साहाला पारावार उरत नाही. काळ बदलल्यावर पिढीदेखील बदलते, असे म्हणतात. कालच्या पिढीला क्वचितच मिळणाऱ्या गोष्टी आजच्या चिमुकल्यांना अगदी सहजतेने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे असे ‘दिवस’ फारसे महत्त्वाचे राहिले नाही, अशी टीका वारंवार करण्यात येते. परंतु जुन्या पिढीने अनुभवलेला तोच आनंद आजच्या ‘हायटेक’ बालकांच्या चेहऱ्यावरदेखील अनुभवायला मिळतो. प्रत्यक्षात पाहिले नसले तरी आजही बालकांना ‘चाचा नेहरू’ जवळचे अन् हक्काचे वाटतात. १४ नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्याच्या पद्धतीत जरी आमूलाग्र बदल होत असले तरी उत्साह अन् त्यातील गाभा मात्र आजही कायम आहे. उपराजधानीच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याला बालदिन म्हणजे स्वत:च्या हक्काचा दिवस आहे याची जाणीव आहे.एक काळ होता जेव्हा ‘बालदिन’ येण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पहायचे. एरवी रागावणारे शिक्षक, पालक यादिवशी विद्यार्थ्यांशी अगदी शांतपणे बोलायचे. शिवाय ज्या हातांनी धपाटे घातले जायचे, त्यांच्याकडूनच खाऊ मिळायचा. त्यामुळे बालदिनाच्या तयारीत बच्चे कंपनी मनापासून गुंतायची. काळ बदलला, अन् शिक्षणपद्धतीदेखील. आता धपाटे तर दूरच राहिले विद्यार्थ्यांना साधे रागवतानादेखील शिक्षकांना चार वेळा विचार करावा लागतो. जुन्या काळातील खाऊ तर कधीच ‘आऊटडेटेड’ झाला आहे. आता तर तोंडातून शब्द काढायचा अवकाश, की काही क्षणांतच हवी ती गोष्ट मिळण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. परंतु इतके असले तरी बालदिन म्हणजे बालकांच्या हक्काचाच दिवस. त्यामुळे बदललेल्या स्वरूपातदेखील त्याच उत्साहात हा दिवस साजरा होतो. विद्यार्थ्यांची विधायक मानसिकतामागील पिढीपेक्षा आताच्या पिढीतील बालके जास्त ‘शार्प’ असल्याचे म्हटल्या जाते. एखादा दिवसाचा इतिहास त्यांना एखादे वेळी माहीत नसेल, परंतु त्यातील भावना मात्र ते नक्कीच जाणतात. आपल्या हक्काचाच दिवस म्हटल्यावर ते त्याला आणखी संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करतात. वंचित बालकांसाठी मदत गोळा करण्याचा विचार याच विद्यार्थ्यांच्या डोक्यातून येतो अन् ते त्यावर झटपट कामालादेखील लागतात. शहरातील निरनिराळ्या शाळांमधून हे चित्र पहायला मिळत आहे. अगदी घरीदेखील एकट्याने हा दिवस साजरा न करता ‘ग्रुप’मध्ये एकत्र येऊन बच्चे कंपनी धम्माल करताना दिसून येते. (प्रतिनिधी)चिमुकल्यांचे भावविश्व विस्तारतेयमुळात आजची ‘जनरेशन’ वेगवान आहे. शिवाय बदलत्या काळात विचारांमध्येदेखील बदल दिसून येत आहेत. एखादा दिवस साजरा करायचा म्हणजे त्याचे ‘प्लॅनिंग’ यांच्या डोक्यात अगोदरपासूनच सुरू होते. शिवाय मदतीला अत्याधुनिक तंत्रज्ञान व निरनिराळी ‘गॅजेट्स’ आहेतच. घरूनदेखील सहकार्य मिळते. यामुळे चिमुकल्यांचे भावविश्व विस्तारत आहेत. लहान लहान गोष्टींचा आनंद घेण्याची पद्धतदेखील बदलत आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अभिषेक मामेर्डे यांनी व्यक्त केले. शहरांतील शाळांमध्ये ‘फुल्ल आॅन’ उत्साहशुक्रवारी होणाऱ्या बालदिनासाठी शहरातील शाळांमध्ये निरनिराळे उपक्रम घेण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला आदरांजली तर वाहण्यात येणारच आहे. शिवाय कथाकथन, चित्रकला स्पर्धा, खेळांच्या स्पर्धा असे उपक्रम तर आहेतच. परंतु यासोबतच कुठे ‘सायंटिफिक स्लोगन’ कुठे चक्क ‘एसएमएस’वर शुभेच्छा देण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. काही शाळांतर्फे विज्ञानविषयक माहितींचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.