शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बांबू उत्पादनाचा सहकार क्षेत्रात समावेश व्हावा; पाशा पटेल यांची केंद्राकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 12:48 IST

इथेनॉल, दगडी कोळसा, कापडा, फ्लोरिंगसह तब्बल १८०० वस्तू या बांबूपासून तयार होतात, त्यामुळे देशात बांबूची मागणी वाढणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पीक न घेता बांबू लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना बांबू लावण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बांबूपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या प्रत्येक जिल्ह्यात रिफायनरी उभारता येऊ शकते. परंतु हे काम एकट्या-दुकट्याचे नाही, सहकारातूनच हे काम शक्य आहे. त्यामुळे बांबूचा समावेश सहकार क्षेत्रात करावा, अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी यावर सविस्तर चर्चाही केली आहे. ही मागणी मान्य झाली तर देशभरात बांबूच्या ३०० रिफायनरी निर्माण होऊ शकतात, असे भाजप नेते व माजी आमदार पाशा पटेल यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले.

इथेनॉल, दगडी कोळसा, कापडा, फ्लोरिंगसह तब्बल १८०० वस्तू या बांबूपासून तयार होतात, त्यामुळे देशात बांबूची मागणी वाढणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पीक न घेता बांबू लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पाशा पटेल यांनी यावेळी बांबूपासून होणाऱ्या कमाईचे गणितच मांडले. ते म्हणाले, ‘ऊस, कापूस यापासून २०-२५ हजारांपेक्षा जास्त उरत नाही; परंतु बांबू लावला तर दोन लाख रुपये उरतात. एक एकर शेतात बांबूची २०० झाडे लावता येतात. एक झाड ३५ रुपयाला पडते. जवळपास एक एकरातून ५० टन बांबू निघतो. ५१०० रुपये टन असा भाव आहे, त्यामुळे जवळपास अडीच लाख रुपये एका एकरातून मिळतात. ५० हजार रुपये खर्च धरला तरी एका एकरातून निव्वळ कमाई दोन लाख रुपये मिळू शकते.

उसापासूनही इथेनॉल तयार होते; परंतु त्यात पाणी भरपूर लागतं. त्याऐवजी बांबूला पाणी कमी लागतं आणि उत्पादन अधिक होते. तसेच माणसाला २८० किलो ऑक्सिजन लागतो. बांबूचं झाड ३२० किलो ऑक्सिजन देतं. बांबू हा ३० टक्क्यांपेक्षा अधिक कार्बन खातं. म्हणून पाणी बचत आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठीसुद्धा बांबूची लागवड आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत भाजप नेते अशोक मानकर, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेलagricultureशेतीFarmerशेतकरी