शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

राज्यातील १७,५१० कनेक्शनची बत्ती गुल; सर्वाधिक तक्रारी नागपूर विभागात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 8:00 AM

Nagpur News राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत.

कमल शर्मा

नागपूर : महावितरणच्या कार्यप्रणालीमुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तक्रारींची दखल घेतली जात नाही. याचा अंदाज यावरूनच येतो की राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत. महावितरणच्या अहवालात याची नोंद असल्यामुळे याची माहिती महावितरणलाही असल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यानंतरही महावितरणने उपाययोजनेसाठी पुढाकार घेतलेला नाही.

महावितरणच्या अहवालात २२ जूनपर्यंतची स्थिती मांडण्यात आली आहे. यात जे कनेक्शन बंद असल्याच्या तक्रारी प्रलंबित आहेत, अशांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, महावितरणचे अधिकारी व्यक्तिगत तक्रारी स्वीकारतात. मात्र, त्याच्यावर उपाय योजण्यात दिरंगाई करतात. बंद असलेल्यांमध्ये सर्वाधिक कनेक्शन नागपूर विभागातील (विदर्भ) आहेत. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी मुख्य अभियंत्यांना या बंद कनेक्शनकडे स्वत: लक्ष देऊन तत्काळ उपाय योजण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकारी काय म्हणतात?

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद करण्यात आलेली स्थिती व वास्तव यात फरक असल्याचे सांगितले. बहुतांश बंद कनेक्शनचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. फक्त लाइनमनने तक्रारी ‘क्लोज’ (बंद) केल्या नाहीत. त्यामुळे अहवालातील आकडा मोठा दिसतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :electricityवीज