शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

अपघातविरहित शहर व्हावे

By admin | Published: January 13, 2015 1:08 AM

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भविष्यात अपघातविरहित शहर व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी,

पालकमंत्र्यांचे आवाहन : रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटननागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भविष्यात अपघातविरहित शहर व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी, अपघात स्थळांचा शोध घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व यांच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी झाले. शहर कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजीव घाटोळे यांच्यासह प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ग्रामीण शरद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, रवींद्र भुयार उपस्थित होते.प्रत्येकाने वाहन चालविताना तसेच रस्त्यावरून चालताना स्वत:च्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली पाहिजे. रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृतीसाठी तसेच कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्य पुरवठा जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कृष्णा म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियान कार्यालयापुरतेच मर्यादित ठेवू नका. शाळा-महाविद्यालयापर्यंत पोहोचवा. या अभियानात सामाजिक संस्था, संघटना यांचाही सहभाग करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक शरद जिचकार यांनी केले. त्यांनी या अभियानात राबिवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. आभार सर्जेराव शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन कर वसुली अधिकारी नाना समर्थ यांनी केले. कार्यक्रमाला शहर बस आॅपरेटर्स डीलर्स, वाहन चालक, ड्रायव्हिंग स्कूलचे पदाधिकारी, राजीव स्पोर्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधे, जीवन सुरक्षाचे राजू वाघ, जनआक्रोश संघटनेचे सचिव रवींद्र कासखेडीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)