शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

संमेलनाध्यक्ष होण्यासाठी ‘पॉवरफुल्ल’ नेत्यांना गळ

By admin | Published: September 11, 2015 3:28 AM

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा दोन वैदर्भीय साहित्यिक असल्याने रंगत वाढली होती.

 ८९ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीची संमेलनासाठी युती राजेश पाणूरकर नागपूर पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा दोन वैदर्भीय साहित्यिक असल्याने रंगत वाढली होती. पण अखेरच्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ प्रा़ रवींद्र शोभणे यांनी कविवर्य विठ्ठल वाघ यांना पाठिंबा देत अर्ज मागे घेतला़ त्यामुळे वैदर्भीयांची मते आता कवी विठ्ठल वाघ यांना मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. कवी विठ्ठल वाघ एका ज्येष्ठ राजकीय नेत्याच्या जवळचे मानले जातात पण त्या नेत्याने दुसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा दिल्याने विठ्ठल वाघ अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे आता बोलले जात आहे. त्यात उमेदवार असणाऱ्या साहित्यिकांनी निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाशी संपर्कसत्र सुरू केल्याचीही बातमी आहे. विदर्भातून संमेलनाध्यपदासाठी वाघ आणि शोभणे यांनी अर्ज भरला होता. त्यात यापूर्वी विठ्ठल वाघ यांनी नाशिक येथील साहित्य संमेलनाची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि दलित साहित्यिकाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतला होता़ त्यामुळे यंदा विठ्ठल वाघ यांना समर्थन मिळावे आणि शोभणेंनी अर्ज मागे घ्यावा, याचे प्रयत्न साहित्य क्षेत्रातील मंडळींनी केले. त्याला अखेर यश आले. विठ्ठल वाघ यांनी काहीही झाले तरी अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने निवडणूकीत काय होणार, याचे अंदाज बांधले जात होते. शोभणेंनाही मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांनीही निवडणूक लढण्याचीच भूमिका कायम ठेवली होती. विठ्ठल वाघ यांची लोकप्रियता आणि शोभणेंचे साहित्य क्षेत्रातले योगदान पाहता वैदर्भीयांमध्येच चुरस निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उघडपणे श्रीपाल सबनीस यांना पाठिंबा दर्शविल्यानंतर शोभणे यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आला. त्यात शोभणे यांना अर्ज मागे घेण्यासाठी मनोहर म्हैसाळकर यांनी विनंती केली. शरद पवार या निवडणुकीत रस घेत असल्याने शोभणे यांनी कवी विठ्ठल वाघ यांना पाठिंबा देत अर्ज मागे घेतला. त्यांच्यासोबतच चंद्रकुमार नलगे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता रिंगणात वाघांसोबत अरुण जाखडे, शरणकुमार निंबाळे, श्रीनिवास वाळुंजीकर व डॉ़ श्रीपाल सबनीस कायम आहेत़ यात विठ्ठल वाघ यांचे नाव जोरात सुरू आहे. ते शरद पवार यांचे निकवर्तीयही आहेत पण ऐनवेळी पवार यांनी सबनीस यांना पाठिंबा देऊन वाघांच्या डरकाळीला मर्यादा आणल्या आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी पवार यांचे सहकार्य विठ्ठल वाघ यांना अपेक्षित होते, असे वाघ यांचे समर्थक सांगत आहेत. पण पवारांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून झालेल्या वादंगात निर्माण झालेला धुराळा शांत करण्यासाठी सबनीस यांना समर्थन दिले, असे बोलले जात आहे. यासंदर्भात विठ्ठल वाघ यांनी मात्र आपण आपल्या संपर्काच्या आणि क्षमतेच्या, साहित्यसेवेच्या बळावरच ही निवडणूक लढवित असल्याचे जाहीर केले. वैदर्भीय साहित्यिकांनी मात्र वाघ यांना संमेलनाध्यक्ष करण्यासाठी कंबर कसली. त्यात शोभणे यांनी माघार घ्यावी, हा प्रयत्न यशस्वी झाला. पण मराठवाडा साहित्य परिषदेची नवनिर्वाचित कार्यकारिणी शरद पवारांच्या कृपेमुळे निवडून आल्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेने श्रीपाल सबनीस यांनाच समर्थन दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक वाघ आणि सबनीस अशीच होण्याची शक्यता आहे. संमेलनासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी युती पिंपरी चिंचवड संमेलनाचे आयोजक डी. वाय. पाटील काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संमेलनात रस दाखविल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची संमेलनासाठी युती झाली असून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पवारसाहेबांना हवा असणारा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात पवारसाहेबांच्या आशीर्वादाशिवाय संमेलनाध्यक्ष होण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता काही उमेदवारांनी थेट पवार साहेबांशी संपर्क साधल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्ष राजकीय पाठिंब्यावर येणार की कर्तृत्वावर हे काळच सांगेल.