शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम

By कमलेश वानखेडे | Updated: December 15, 2023 17:18 IST

आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. 

नागपूर: 30 ऑक्टोबर रोजी बीड शहरात झालेल्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी दोषी असलेल्यांना सोडणार नाही, निश्चित कारवाई करू, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. 

माझ्या घरासमोरच पोलीस मुख्यालय आहे. मी पोलिसांना फोन केले पण प्रतिसाद मिळाला नाही. घराच्या गेट बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पण काहीच केले नाही. या घटनेचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही. पण यातील आरोपी कुणाशी फोनवर बोलत होते याचा रेकॉर्ड काढला तर यातील मास्टर माईंड समोर येईल. ते सात तास पोलीस कुणाच्या म्हणण्यावर शांत होते, असा सवाल करीत या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आ. क्षीरसागर यांनी केली. 

आ. जयंत पाटील यांनी एवढा मोठा हल्ला होणार आहे हे आधी कसे कळाले नाही, पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही,  पालकमंत्र्यांनी स्वतः मागणी करूनही एसआयटी स्थापन का केली नाही, असे सवाल केले. या सर्व घटनेचे समन्वय घडवून आणणारा पप्पू शिंदे हा कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा भाचा आहे, हे जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. 

यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणी २७८ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ३० जन सराईत गुन्हेगार आहेत. बीड मधील ६१ आरोपी तर माजलगाव मधील ४० आरोपी अद्याप फरार आहेत. सिसी टीव्ही मध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला त्यांनाच अटक केली आहे. हे सर्व नियोजित होते का हे तपासून पाहिले जात आहे. यातील मास्टर माईंड शोधत आहोत व दोषिवर कारवाई करणारच, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Sandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर