शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुचाकींना ‘सीबीएस’ व ‘एबीएस’ प्रणालीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:37 IST

दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून होणार लागू : अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.रस्ता अपघातात दुचाकी वाहनांच्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. हे टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने १६ मार्च २०१६ रोजी ‘एबीएस’ किंवा ‘सीबीएस’ प्रणाली बसविण्याच्या सूचना मंत्रालयाकडून दिल्या होत्या. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर काही राज्यात ही प्रणाली राबविण्यात आली. आता १ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ही प्रणाली बसविणे अनिवार्य होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, वाहन डीलर्सला २०२० पर्यंत जुन्या ब्रेक प्रणालीची सर्व वाहने विक्रीस काढावी लागणार आहे.काय आहे ‘एबीएस’ प्रणालीजुन्या वाहनांमध्ये असलेला ब्रेक दाबल्यास चाक ‘लॉक’ होऊन वाहन घसरण्याची भीती असते. परंतु ‘एबीएस’मुळे पुढील आणि मागील चाकाच्या ब्रेकमध्ये समन्वय साधला जातो. परिणामी गाडी घसरत नाही. रस्ता ओला असेल किंवा घसरण्याची शक्यता अधिक असेल किंवा गाडी उलटल्यास या यंत्रणेमुळे अपघात टाळणे शक्य होते. १२५सीसी इंजिनवरील नव्या वाहनांना ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे.अशी आहे ‘सीबीएस’ प्रणालीअनेक वाहन चालक आपल्या अनुभवानुसार दुचाकीला ब्रेक लावताना मागील व पुढील ब्रेक एकाचवेळी दाबतात. यामुळे गाडी घसरण्याची शक्यता कमी होते. परंतु प्रत्येकाला असा ब्रेक लावणे शक्य होत नाही. यासाठी ‘कम्बाईंड ब्रेकिंग सिस्टीम’ आली आहे. ही प्रणाली लावल्यावर पुढील व मागील चाकावरील दाब समान करीत असल्याने वाहन घसरून अपघाताची शक्यता कमी होते. ही यंत्रणा १०० ते १२५ सीसी इंजिनच्या सर्व नव्या दुचाकी वाहनांसाठी सक्तीची करण्यात आली आहे.उत्पादित दुचाकींसाठी अनिवार्य१ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ‘सीबीएस’ किंवा ‘एबीएस’ प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीलर्सला ३१ मार्च २०२० पर्यंत जुन्या ब्रेकची दुचाकी वाहने विक्रीस काढावी लागणार आहेत.उमेश पाटणीसदस्य, विदर्भ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन

टॅग्स :bikeबाईकRto officeआरटीओ ऑफीस