शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

कट्टरता कम्युनिस्टांनी आणली, हिंदूंनी नव्हे!  मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 23:09 IST

कट्टरता हा शब्द भारतीय नाही. हा शब्द कम्युनिझममधून आलेला आहे. हिंदू किंवा संघ स्वयंसेवक निष्ठावान असतो, विचारक असतो. हिंदुत्व ही एक दृष्टी, तत्त्वज्ञान आणि विचारांचे बीज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.

ठळक मुद्दे पश्चिमेकडील शब्द आणि आपल्या विचारांत तफावतदुसऱ्या नागपूर लिटररी फेस्टिव्हलचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कट्टरता हा शब्द भारतीय नाही. हा शब्द कम्युनिझममधून आलेला आहे. हिंदू किंवा संघ स्वयंसेवक निष्ठावान असतो, विचारक असतो. हिंदुत्व ही एक दृष्टी, तत्त्वज्ञान आणि विचारांचे बीज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.झील फाऊंडेशन व नागपूर लिटरेचर फाऊंडेशनच्या वतीने उत्तर अंबाझरी मार्ग, सीताबर्डी येथील सोहम सभागृहात दुसºया द्विदिवसीय नागपूर लिटररी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. रजनीश शुक्ल, सच्चिदानंद जोशी, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर, जनरल ए.एस. देव उपस्थित होते.पाश्चिमात्यांना आपले विचार, आपली संस्कृती इतरांवर लादण्याची सवय आहे. प्रत्येकाची विचारप्रणाली भिन्न असते आणि त्यातूनच शब्दांची निर्मिती होत असते. त्यामुळे आपल्या स्वभावाला परिचायक असलेल्या आपल्याच शब्दांचा वापर आपण करणे योग्य ठरेल. पश्चिमेकडील शब्दांचे अनुवाद आपल्या भावनेशी निगडित शब्दांशी जोडले तर विपर्यास होईल. येथील संस्कृतीत जीवनाचे चिंतन आध्यात्मिक आहे आणि म्हणूनच भारत एक व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येतो. ‘टॉलरन्स’ हा शब्द आपल्यासाठी अत्यंत गौण आहे. मात्र, तो आजकाल सर्रास वापरला जात आहे. आपल्याला त्या शब्दाच्या अर्थाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागणार असून, भारतीय विचार विभक्त होण्याचा नाही तर सामावून घेण्याचा असल्याचे मत डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले. धर्म हा आचरणाचा भाग आहे आणि तो व्यक्तिपरत्वे बदलतो. आपल्याकडे देण्याच्या वृत्तीला, कर्तव्याला, जबाबदारीला धर्म संबोधले गेले आहे. म्हणून आपली धर्माची संकल्पना जोडण्याशी निगडित आहे, तोडण्याशी नव्हे. जो समाज राज्यव्यवस्थेवर निर्भर असतो, तो निस्तेज असतो. म्हणून पुरुषार्थ कमावण्याची सवय समाजाला लावावी लागेल, असे आवाहन वैद्य यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार सई देशपांडे यांनी मानले.

टॅग्स :HinduहिंदूCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया