शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

देशात अध्यक्षीय प्रणाली आणण्याचा भाजपचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2023 22:35 IST

Nagpur News देशात हुकूमशाही किंवा अध्यक्षीय पद्धती आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे पत्रपरिषदेत केला.

नागपूर : देशाच्या इतिहासात प्रथमच पैशांच्या जोरावर बहुमतातील सरकार पाडले जात आहे. छोटे पक्ष संपविण्याच्या गोष्टी केल्या जात असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा लावला जात आहे. त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे. हे सर्व एका षड्यंत्रानुसार सुरू असून देशात हुकूमशाही किंवा अध्यक्षीय पद्धती आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे पत्रपरिषदेत केला.

भाजप सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या ओबीसी, एस.सी., एस.टी. व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शनिवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मोघे म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा भ्रष्टाचार व हुकूमशाही विरोधात संसदेत आणि रस्त्यावर लढा देऊन जनतेसमोर सत्य मांडले. शिवाय भारत जोडो यात्रेतून त्यांची प्रतिमा उजळली होती. त्याच धास्तीतून मोदी सरकारने षडयंत्र रचून त्यांचा आवाज दाबण्यासाठी सुरत कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेत खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. अदानीच्या प्रश्नांवर गत काही दिवसांपासून संसद ठप्प आहे. त्यावर सरकार उत्तर देत नाही. त्यावर आवाज उचलणाऱ्यांना छोट्या पक्षांना टार्गेट केले जात आहे. असेच चित्र राहिल्यास २०२४ नंतर देशात हुकूमशाही किंवा अध्यक्षीय पद्धत अस्तित्वात येईल, असा दावाही त्यांनी केला. पत्रपरिषदेला माजी आ. नामदेव उसेंडी, गोविंद भेंडारकर, वसीम खान, राहुल घरडे, फजल रहमान, प्रदीप मसराम, दशरथ मडावी, संजय दुधे उपस्थित होते.

 

संघाचेही ऐकेनात मोदी !

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही असा प्रकार नव्हता. मात्र, दिवसेंदिवस देशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. प्रतिमा उंचावण्याच्या नादात संघापेक्षाही मोदी मोठे झाले आहेत. मोदी संघाचेही ऐकत नाहीत, असेही मोघे म्हणाले.

टॅग्स :Shivajirao Mogheशिवाजीराव मोघे