शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

नागपूर जिल्ह्यातल्या डेगमा गावात पाच वर्षांनी बससेवा पुन्हा सुरू; ग्रामस्थांचा आनंदोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 10:43 IST

पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.

ठळक मुद्देपुरेसे प्रवासी मिळत नसल्याने बससेवा बंद होती

आॅनलाईन लोकमतनागपूर: गावात येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक पाच वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे गावातून बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत. ही बाब लक्षात घेता बस सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. अखेर पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.डेगमा येथे साधारणत: पाच वर्षांपूर्वीपर्यंत एसटी महामंडळाची बस येत होती. मात्र प्रवासी पुरेसे मिळत नसल्याने तोट्यात असलेली बसफेरी एसटी महामंडळाने बंद केली. परिणामी एसटी बसफेरी बंद होताच विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना इतर कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी खासगी वाहनांचा आधारही घेतला जात.दुसरीकडे एसटी बसफेरी बंद होताच या भागात अवैध प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आले. गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी नागरिकांना बऱ्याचदा कितीतरी वेळ बसून राहावे लागत अन्यथा पायीवारी करावी लागत.ही अडचण लक्षात घेता नागरिकांनी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. त्या मागणीबाबत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार केला.त्या मागणीचा पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर सोमवार (दि. ३०)पासून बसफेरी सुरू करण्यात आली. गावात सोमवारी बसफेरी पोहोचताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. सकाळी १० व सायंकाळी ५ वाजता अशा दोन बसफेऱ्या डेगमासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.डेगमा मार्गावर कोकर्डी, माथनी ही गावे असून बसफेरी सुरू झाल्याने डेगमासोबतच या दोन्ही गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना फायदा होईल. त्यामुळे प्रत्येक बसफेरीसाठी आवश्यक अशी प्रवासीसंख्या मिळून बसफेरी नियमित सुरू राहील, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

तर बसफेरी सुरू राहील!डेगमा येथील बसफेरी कमी प्रवासीसंख्येमुळे बंद करण्यात आली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता पुन्हा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. या बसफेरीला पुरेसे प्रवासी मिळाले तर बसफेरी कायम सुरू राहील.- सुधीर पंचभाई,विभागीय नियंत्रक,राज्य परिवहन महामंडळ

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ