शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शहरातून आले, गावाबाहेर क्वारंटाईन झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:29 IST

अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेलतूरला राहणारा चंदू वर्षभरापासून कामासाठी पुण्यात राहायला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि काम बंद झाले. साधन नसल्याने स्वत:ची सायकल घेतली आणि गावाकडे निघाला. सोबत गावचाच किरणही होता. अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.चंदू आणि किरण सध्या शाळेत राहत आहेत. घरचे लोक सकाळ-संध्याकाळचा जेवणाचा डबा शाळेत नेऊन देतात. हा डबा त्यांनाच स्वच्छ करावा लागतो. ते बाहेर निघू नयेत म्हणून बाहेरून लॉक करण्यात आले आहे. चेहºयावर निराशा आहे पण नाईलाज आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याला औंधजवळ एका कंपनीत काम करणारी दीपा कुही तालुक्यातील डोंगरदरा या गावी पोहचली. पण गावकऱ्यांनी तिला गावातील शाळेत ठेवले. त्या शाळेत बाहेरून आलेली एक मुलगी पूर्वीपासून वास्तव्यास होती. तिची आई घरून जेवणाचा डबा पोहचविते, दुरूनच बोलते. मनाला चटका लावणारी परिस्थिती आहे. दीपासोबत त्या दिवशी भंडारा, वडसा, ब्रम्हपुरी आदी गावच्या २२ मुली ट्रॅव्हल्सने नागपूरला पोहचल्या. एसटीने त्या आपल्या गावी गेल्या तेव्हा त्यांनाही असेच बाहेर ठेवण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील गोसे या गावी दोन किमी दूर असलेल्या शाळेत बाहेरून आलेल्या व्यक्तींना ठेवण्यात आले असून नातलग त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात.गावोगावी सध्या हीच परिस्थिती आहे. शहरात नोकरी, काम व शिक्षण घेणारी गावची मुले जेव्हा परतली तेव्हा गावकऱ्यांनी कठोर भूमिका घेत त्यांना प्रवेश नाकारला. गावाबाहेर राहण्यासाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी १४ दिवस राहण्याची सक्ती करण्यात आली. गावकऱ्यांच्या दबावापुढे नातलगही हतबल दिसून येत आहेत. गावी येऊनही दूर राहावे लागत असल्याने बाहेरून आलेल्यांमध्ये नैराश्य आहे. पण परिस्थितीपुढे सर्वांचे हात टेकले आहेत.डर के आगे जीत हैस्वत:ची सुरक्षा आणि भीतीमुळे गावकऱ्यांनी शहरातून आलेल्या आपल्याच माणसाला जवळ न घेता बाहेरच ठेवण्याची कठोर पावले ग्रामस्थांनी उचलली आहेत. मात्र या भीतीमुळेच गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले, असे म्हणायला हरकत नाही. शहरात नियंत्रण ठेवणाºया यंत्रणा आहेत पण गावात हा धोका पसरला तर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गावात येणारे मार्ग बंद केले, पहारा देणे सुरू केले. गावात येणाऱ्या बाहेरच्या माणसाला मज्जाव केला. त्यामुळे गावात कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण राखणे शक्य झाले आहे.