शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

स्मार्ट सिटीच्या निधीवर केंद्राचे लक्ष

By admin | Published: September 13, 2015 2:37 AM

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या शंभर शहरांना केंद्र सरकारकडून विकास निधी मिळणार आहे.

मनपा स्वतंत्र खाते उघडणार : सल्लागाराची नियुक्तीनागपूर : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या शंभर शहरांना केंद्र सरकारकडून विकास निधी मिळणार आहे. मिळणारा निधी स्मार्ट सिटीच्या कामावरच खर्च होतो की नाही, यावर केंद्र सरकारचे लक्ष राहणार आहे. या निधीसाठी महापालिकेला स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या शहरांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व राज्यांना १८० कोटी रुपये कें द्र सरकारकडून वितरित करण्याचे निर्देश केंद्रीय सचिवांनी नगरविकास विभागाला दिले आहे. यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे. राज्य सरकारलाही या निधीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. मनपाने स्वतंत्र बँक खाते उघडण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या महापालिकांना पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीचा विकास आराखडा तयार करावा लागणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करावयाचा आहे. यासाठी केंद्र सरकारकडून पैसे मिळणार आहे. मनपाने क्रिसिल रिस्क या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला गेल्या गुरुवारी मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय शहर स्पर्धेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागपूर शहराचा प्रस्ताव तयार करण्याच्या कामात ही कंपनी मदत करणार आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त होणारा निधी स्मार्ट सिटीच्या विकासावरच खर्च होतो की नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्रीय सचिवांना केल्या आहे. स्मार्ट सिटीच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक महापालिकांना १०० कोटीचा निधी प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)