शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

दहशतवादी जयेशविरुद्ध दाखल होणार चार्जशीट; आतापर्यंत सुप्रीम कोर्टात गेली नाही ‘एनआयए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2023 20:21 IST

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या जयेश ऊर्फ कांथा पुजारी ऊर्फ मो. शाकीरच्या प्रकरणात शहर पोलिस न्यायालयात चार्जशीट सादर करणार आहे.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या जयेश ऊर्फ कांथा पुजारी ऊर्फ मो. शाकीरच्या प्रकरणात शहर पोलिस न्यायालयात चार्जशीट सादर करणार आहे. ‘एनआयए’ने आतापर्यंत या प्रकरणाचा तपास आपल्या हातात न घेतल्यामुळे पोलिस चार्जशीट दाखल करण्याच्या कामाला लागले आहेत.

जयेशने दोनवेळा गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयात फोन करून खंडणी मागितली होती. त्यानंतर त्याला बेळगाव तुरुंगातून अटक करून नागपुरात आणण्यात आले. चौकशीत त्याचे ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘पीएफआय’, ‘आयएसआय’, ‘तालिबान’, तसेच ‘डी’ कंपनीसोबत संबंध असल्याचा खुलासा झाला. त्या आधारावर त्याच्याविरुद्ध दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला आपला चौकशी अहवाल पाठविला होता. त्या आधारावर ‘एनआयए’ने बंगळुरूत जयेशविरुद्ध यूएपीएचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’च्या मुंबई शाखेच्या वतीने करण्यात येत होता. सूत्रांनुसार केंद्रीय गृहमंत्रालयात नागपुरात दाखल झालेल्या यूएपीए प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ला घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर या प्रकरणात नवा पेच निर्माण झाला. ‘एनआयए’ला नागपुरात दाखल प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता होती. ‘एनआयए’ने बंगळुरू हायकोर्टात अर्ज केला. बंगळुरू हायकोर्टाने हे प्रकरण आपल्या अधिकारक्षेत्राबाहेरील असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘एनआयए’ने नागपूरच्या सत्र न्यायालयात अपील केले. सत्रन्यायालयाने ‘एनआयए’च्या अपिलावर प्रश्न उपस्थित करून त्यांना सक्षम प्राधिकरणाकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर एनआयए सुप्रीम कोर्टात जाणार होती.

यामुळे शहर पोलिसांनी जयेशविरुद्ध चार्जशीट सादर करू शकत नव्हती. अनेक दिवसांनंतरही ‘एनआयए’ने सुप्रीम कोर्टात अपील केलेली नाही. दरम्यान, जयेशच्या वकिलाने न्यायालयातून त्याला बेळगावच्या तुरुंगात पाठविण्याची विनंती केली. शहर पोलिसांनी जयेशच्या प्रकरणाचे गांभीर्य समजवून आरोपपत्र सादर करण्यासाठी ९० दिवसांचा वेळ मागितला. न्यायालयाने पोलिसांना ५० दिवसांची सवलत दिली आहे. सूत्रांनुसार न्यायालय आणि ‘एनआयए’ची भूमिका पाहून शहर पोलिसांनी स्वत: जयेशविरुद्ध आरोपपत्र सादर करण्याचे ठरविले आहे.

 

...................

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय