शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

भूमाफियांची कुंडली तपासणार

By admin | Published: May 17, 2017 1:52 AM

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांभोवती भक्कम कारवाईचा फास

एसआयटीची व्याप्ती ग्वालबन्सी प्रकरणापुरती मर्यादित नाही नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांभोवती भक्कम कारवाईचा फास आवळण्याच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) व्याप्ती केवळ ग्वालबन्सी प्रकरणापुरतीच मर्यादित नाही. ग्वालबन्सी, त्याचे गुन्हेगार नातेवाईक, ग्वालबन्सी टोळीतील गुंड आणि त्यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपणाऱ्या भूमाफियांचीही कुंडली एसआयटी तयार करीत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिली. शेकडो गोरगरीब नागरिक आणि सर्वसामान्य नोकरदारांसोबतच चक्क पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही जमीन हडपणाऱ्या भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, जगदीश ग्वालबन्सी, हरीश ग्वालबन्सी आणि त्याच्या नातेवाईकांसह गुंडांवरही पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक कालावधीपासून गिट्टीखदान, काटोल मार्ग, झिंगाबाई टाकळी, हजारी पहाड, सुरेंद्रगड, कोराडी, गोधनी आणि आजूबाजूच्या परिसरात ग्वालबन्सी टोळीने पैसा आणि दंडुकेशाहीच्या जोरावर अक्षरश: हैदोस घातला आहे. त्यांच्या गुंडगिरीसोबतच राजकीय संरक्षणाची जोड असल्याने पोलिसही त्यांच्यावर कारवाई करीत नव्हते. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आतापर्यंत भल्या भल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जे केले नाही, ते करण्याचे धाडस दाखविले. केवळ गुन्हेच दाखल केले नाही तर ग्वालबन्सीला गजाआड करून त्याच्या साम्राज्यावर बुलडोझरही चालविला आहे. अनेक पीडितांना त्यांची जमीन परत करण्याचीही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वातील शहर पोलीस दलाने केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नागपूर पोलिसांवर स्तुतिसुमने उधळत आहेत. दुसरीकडे केवळ ग्वालबन्सीच नव्हे तर त्याच्यासारखे अनेक भूमाफिया आणि त्याची पिलावळ उपराजधानीत वळवळत असल्यामुळे या पिलावळीलाही ठेचले जावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहे. इच्छा असूनही अनेक पीडित नागरिक विविध भागातील भूमाफियांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची हिंमत दाखवत नाही. अशी या भूमाफियांची विविध भागात दहशत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांशी लोकमतने विशेष बातचीत केली. ती पुढीलप्रमाणे आहे. एसआयटीची निर्मिती केवळ ग्वालबन्सी प्रकरणापुरतीच आहे का? पोलीस आयुक्त : नाही. अशाप्रकारचे जेवढे गुन्हे शहरात झाले आहेत किंवा जे जे पीडित तक्रार करीत आहेत त्या सर्वच प्रकरणाची चौकशी करून पोलीस कडक कारवाई करणार आहेत. सर्वसामान्य नागरिक भूमाफियांच्या दहशतीमुळे तक्रार करण्यास घाबरतात. पोलीस आयुक्त : अजिबात घाबरण्याचे कारण नाही. पीडित नागरिकांनी बिनधास्तपणे एसआयटीकडे तक्रारी कराव्या. प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल का? पोलीस आयुक्त : हो, प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल. मात्र, तक्रार करणाऱ्यांनी बनवाबनवी करू नये. पुराव्यानिशी तक्रार करावी. उगाच कुणाला त्रास देण्याच्या हेतूने कुणाची खोटी तक्रार केल्याचे स्पष्ट झाल्यास खोटी तक्रार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अनेकदा तक्रार करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे पीडितांना तासन्तास बसावे लागते. त्यामुळे संबंधित तक्रारकर्त्यांनी थेट कुणाला भेटावे, त्यासाठी कुणी अधिकारी उपलब्ध होईल का? पोलीस आयुक्त : होय. नक्कीच उपलब्ध होतील. गुन्हेशाखेचे पोलीस आयुक्त संभाजी कदम किंवा सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांची थेट भेट घेऊन पीडित व्यक्ती तक्रार करू शकतात. या संबंधाने गुन्हेशाखेच्या (०७१२ : २५६६६०४ किंवा २५६५५७०) संपर्क नंबरवर पीडित व्यक्ती फोन करू शकतात. भूमाफियांची दहशत कमी करण्यासाठी मोक्कासारखी कडक कारवाई करणार का ? पोलीस आयुक्त : भूमाफिया, गुंडांच्या टोळ्या यांची दहशत कमी करण्यासाठी पोलीस शक्य होईल तेवढी कडक आणि कायदेशीर कारवाई करणार आहेत. त्यासाठी नागपुरातील भूमाफिया आणि गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली आहे.