शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

‘मराठा कुणबी’प्रमाणे ‘गाेंड गाेवारीं’चे महसुली पुरावे तपासा; गाेवारी समाजाची मागणी

By निशांत वानखेडे | Published: January 24, 2024 5:00 PM

गाेवारी समाजातर्फे २६ जानेवारीपासून उपाेषण आंदाेलन.

निशांत वानखेडे, नागपूर : आदिवासी गाेवारी समाजातर्फे १९९४ साली काढलेल्या माेर्चात ११४ गाेवारी बांधव शहीद झाले, त्या घटनेला ३० वर्षाचा काळ लाेटत आहे, पण अद्यापही गाेवारी समाजाला न्याय मिळाला नाही. मराठा आंदाेलनाचा धसका घेऊन ज्याप्रमाणे राज्य सरकार वेगवान हालचाली करीत मराठा कुणबीचे पुरावे तपासत आहे, त्याप्रमाणे गाेंड गाेवारी समाजाचे १९५० पूर्वीचे महसुली पुरावे तपासण्यात यावी, अशी मागणी आदिवासी गाेंड गाेवारी जमात संविधानिक हक्क कृती समितीने केली आहे.

कैलास राऊत यांच्या कृती समितीने येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून संविधान चाैकात आमरण उपाेषण सुरू करण्याची घाेषणा केली आहे. राऊत यांनी सांगितले, १९५५ साली तत्कालिन काकासाहेब कालेलकर मागासवर्गीय आयाेगाने गाेवारी जमातीची शिफारस गाेंडाची उपजात म्हणून केली हाेती. मात्र राज्य सरकारने २४ एप्रिल १९८५ साली जीआर काढून गाेवारी समाजाचे संविधानिक हक्कच हिरावून घेतले. त्याविराेधात २३ नाेव्हेंबर १९९४ साली भव्य माेर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये ११४ गाेवारी बांधवांचे बळी गेले. तेव्हापासून समाजातर्फे कायदेशीर लढा दिला जात असून १८ डिसेंबर २०२० राेजी समाजाने सर्वाेच्च न्यायालयात ही कायदेशीर लढाई जिंकली. मात्र राज्य सरकार अद्याप त्यांचे हक्क द्यायला तयार नाही.

नुकतेच हिवाळी अधिवेशनादरम्यान गाेवारी बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी १४ डिसेंबर २०२३ राेजी माेर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व प्रधान सचिव यांच्याशी कृती समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी २०२० च्या न्यायालयीन निकालाचा अभ्यास करून सकारात्मक मुद्द्यावर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित सचिवांना दिले हाेते. मात्र एक महिना उलटूनही सरकारकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली, महाविद्यालयांनी त्यांच्या पदव्या राेखल्या आहेत. 

मुलांचे शिक्षण थांबण्याची वेळ आली आहे. हा अन्याय आता सहन हाेत नसून सरकारने आमच्यावर रस्त्यावर उतरण्याची पाळी आणली, अशी टीका राऊत यांनी केली. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपाेषण सुरू करणार असल्याची घाेषणा त्यांनी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरStrikeसंप