शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

मुख्यमंत्री लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:37 IST

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला मिळालेल्या प्रचंड यशाने उत्साहित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. नागपुरातील आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे त्यांनी त्यांचे विधानसभा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या बूथनिहाय मतदानाचा आढावा घेतला. कमजोर असलेले बूथ मजबूत करण्याच्या सूचना करीत पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देदक्षिण-पश्चिम नागपुरातील बूथनिहाय मतांचा घेतला आढावाकमजोर बूथ मजबूत करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला मिळालेल्या प्रचंड यशाने उत्साहित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. नागपुरातील आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे त्यांनी त्यांचे विधानसभा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या बूथनिहाय मतदानाचा आढावा घेतला. कमजोर असलेले बूथ मजबूत करण्याच्या सूचना करीत पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.या बैठकीत महापौर नंदा जिचकार, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष किशोर वानखेडे यांच्यासह दक्षिण-पश्चिममधील पक्षाचे सर्व पदधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना १ लाख २० हजार १८५ मते मिळाली. काँग्रेसचे नाना पटोले यांना ६५,०६९ मते मिळाली. गडकरी यांना येथून ५५,११६ मतांची आघाडी मिळाली, हे विशेष. वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांना येथून ६०६५ आणि बसपाच्या मो. जमाल यांना ५९६२ मते मिळाली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी सकाळी ९ वाजता मतदारसंघातील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यांनी सर्वात अगोदर पदाधिकारी व नगरसेवकांचे अभिनंदन केले. यानंतर प्रत्येक बूथची माहिती घेतली. दलितबहुल भागातील बूथवर पक्षाला कमी मतदान झाल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा सर्व बृथवर जनसंपर्क आणखी वाढवून ते मजबूत करण्याचे निर्देश दिले.बैठकीत कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, नरसेवक राजू हडप, लक्ष्मी यादव, विजय चुटीले, लखन येरावार, मीनाक्षी तेलगोटे आदी उपस्थित होते.नवीन मतदारांवर अधिक भरमुख्यमंत्री फडणवीस यांनी काही बूथवर पक्षाला अपेक्षित मते न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा बूथवरील नवीन मतदारांना जोडण्यावर भर देण्यास सांगितले. पदाधिकारी आणि नगरसेवकांना आपापल्या परिसरातील नवीन मतदारांच्या नोंदणीकडे लक्ष देण्यास सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्या, असेही सांगितले.

 

 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक