शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मुख्यमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुक

By admin | Published: January 12, 2016 2:59 AM

अपहरण केलेल्या मनीषनगर येथील चैतन्य आष्टनकर याची नागपूर पोलिसांनी सुखरूप सुटका केली.

चैतन्य आष्टनकर अपहरण : पोलिसांची महत्त्वाची कामगिरीनागपूर : अपहरण केलेल्या मनीषनगर येथील चैतन्य आष्टनकर याची नागपूर पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या अपहरण नाट्यात नागपूर पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावून मोठ्या कौशल्याने हे प्रकरण हाताळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपोलीस आयुक्त राजवर्धन, पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, सहायक पोलीस आयुक्त तोरे आदींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.चैतन्य सुभाष आष्टनकर या १४ वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण झाले होते. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे झाले होते. मुलाला काहीही होऊ नये या दिशेने पोलिसांनी व्यूहरचना आखली. मोठ्या कौशल्याने व शिताफीने गुन्हेगारांना अटक करून चैतन्यची सुखरूप सुटका केली. या अपहरणामागे खंडणीचा हेतू होता. नागपूर शहरातील नागरिकांचे या घटनेकडे लक्ष लागले होते. चैतन्यचे बरेवाईट तर होणार नाही ना, अशी भीती वाटत होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: याकडे लक्ष ठेवून होते. पण या नाट्यमय घटनेचा शेवट चांगला झाल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि पोलिसांचे जाहीर कौतुक केले.या सर्व मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, सचिन लुले, दिनेश दहातोंडे, प्रमोद सानप, श्रीनिवास मिश्रा, तसेच सोनेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, संदीप येळे व पोलीस हवालदार धर्मेंद्र सरोदे, संदीप पाटील व इतर यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)