शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंजाबच्या धर्तीवर विदर्भात होणार ‘सिट्रस इस्टेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 11:45 IST

संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात घोषणालोकमतच्या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टीव्हल’चे फलित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात तशी घोषणा केली. यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. लोकमतच्या पुढाकाराने नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टीव्हल’चे हे फलित आहे. या फेस्टीव्हलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत सुचविले होते.पंजाबमध्ये ६० हजार हेक्टरवर संत्र्याच्या किन्नो जातीची लागवड आहे. तेथे प्रति हेक्टर २१ टन उत्पादन होते. विदर्भात मात्र ही उत्पादकता ६ ते ७ टन आहे. पंजाबमध्ये ‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना संत्रा कलम तयार करण्यापासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन केले जाते, मदत दिली जाते. त्याच धर्तीवर विदर्भातही मदत व्हावी म्हणून गेल्या सात-आठ वर्षांपासून महाआॅरेंज प्रयत्न करीत आहे. लोकमतच्या पुढाकाराने नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टीवलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाआॅरेंजच्या संबंधित प्रस्तावावर विचार करण्याची सूचना केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर प्रस्ताव मागवून घेतला व अर्थसंकल्पात ‘सिट्रस इस्टेट’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.पतंजलीचा फळ प्रक्रिया प्रकल्प नागपुरात लवकरच सुरू होत आहे. यासाठी त्यांना फळांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता लागणार आहे.

सिट्र्स इस्टेटमध्ये काय होणार ?संत्रा लागवड असलेल्या जिल्ह्यांमध्ये संत्र्यांच्या दर्जेदार कलमांची निर्मिती करणे, नवीन जाती विकसित करणे, रोग प्रतिबंधक करण्याविषयी मार्गदर्शन, चांगल्या उच्च दर्जाच्या फळांची निर्मिती, त्याचे ग्रेडिंग व कोटिंग, विक्री व्यवस्थापनास मार्गदर्शन ही जबाबदारी ‘सिट्रस इस्टेट’ कडून पार पाडली जाईल. यात शासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल. त्यामुळे संत्र्याचा दर्जा व उत्पादनातही वाढ होईल.

संत्रा उत्पादनात क्रांती होईलराज्य सरकारने विदर्भात सिट्रस इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने येथे संत्रा उत्पादनात मोठी क्रांती होईल. याचा लाभ संत्रा उत्पादकांना होईल. यामुळे जगात प्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्याची गुणवत्ता आणखी सुधारण्यास मदत होईल. अलिकडच्या काळात संत्र्यासाठी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे.- श्रीधरराव ठाकरे,अध्यक्ष, महाआॅरेंज

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल