शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

रेल्वेचे आॅपरेशन क्लीन

By admin | Published: January 11, 2016 2:34 AM

हाय अलर्टच्या काळात सुरक्षा व्यवस्थेत दिरंगाई केल्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

प्रशासन झाले सज्ज : आरपीएफही मैदानातनागपूर : हाय अलर्टच्या काळात सुरक्षा व्यवस्थेत दिरंगाई केल्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने खबरदारी बाळगून सलग तीन दिवस दारूची तस्करी पकडून रेल्वेस्थानकावर गस्त वाढविली. यात ३३४८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून रेल्वे प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त केला. परंतु चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही.स्थानकावर दारूच्या १९२ बाटल्या जप्तरेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक २ वर मुंबई एण्डकडील भागात ओव्हरब्रिजखाली शनिवारी रात्री ११.४५ वाजता १९२ दारूच्या बाटल्या बेवारस स्थितीत आढळल्या. रेल्वे सुरक्षा दलाने कागदोपत्री कारवाई करून या बाटल्या लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत.शनिवारी रात्री रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक केदार सिंह आणि राजू खोब्रागडे प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. रात्री ११.४५ वाजता मुंबई एण्डकडील भागात ओव्हरब्रीजच्या खाली त्यांना एक बेवारस बॅग आढळली. आजूबाजूला उपस्थित प्रवाशांना चौकशी केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यानंतर या बाबीची सूचना ड्युटीवर उपस्थित उपनिरीक्षक दिलीप कुमार यांना दिली. त्यानंतर ही बॅग रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणून दोन पंचासमक्ष पंचनामा केला. बॅगमध्ये ९० मिलिलिटरच्या आॅफिसर्स चॉईस कंपनीच्या १९२ बाटल्या आढळल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ८४६० रुपये आहे. त्यानंतर या बाटल्या लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या. नागपूर रेल्वेस्थानकावरून चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी वाढली असून पोलिसांनी सतर्क राहून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.