शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भारताला ३ ट्रिलियन डाॅलरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2022 7:30 AM

Nagpur News हवामान बदलाच्या घडामाेडीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मागील २० वर्षांत ७९.५ बिलियन डाॅलरचा फटका सहन करावा लागला आहे.

ठळक मुद्देगेल्या २० वर्षात ७९ बिलियन डाॅलरचा फटकाजीडीपीचा ताेटा २ टक्क्यांवर

:

निशांत वानखेडे

नागपूर : ग्लाेबल वार्मिंग आणि हवामान बदलामुळे हाेणारे नुकसान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महापूर, भूस्खलन, चक्रीवादळे, उष्ण लहरी किंवा शीतलहरींमुळे हाेणारे नुकसान हे थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहे. वर्ल्ड मेटरालाॅजिकल ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार हवामान बदलाच्या घडामाेडीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मागील २० वर्षांत ७९.५ बिलियन डाॅलरचा फटका सहन करावा लागला आहे. देशाचा जीडीपी १ टक्क्याने कमी झाला असून २०५० पर्यंत हे नुकसान तब्बल ३ ट्रिलियन डाॅलरवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्रीय वने, पर्यावरण आणि जल वायू परिवर्तन मंत्रालयाचे सदस्य सुरेश चाेपणे यांनी हवामान बदलाच्या परिणामांचे विश्लेषण केले. त्सुनामी, महापूर यामुळे अनेक नागरी वस्त्यांना फटका बसताे, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, राेजगार असे बरेच प्रश्न निर्माण हाेतात. जंगलावर, जैवविविधतेवर परिणाम हाेतात. अतिपाऊस, अवकाळी पावसाने शेतीला नुकसान हाेते. शेकडाे वर्षांपासून शेतकरी ऋतूंच्या ठराविक वेळेनुसार शेतीची मशागत करीत आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत ऋतुचक्रात झालेल्या बदलामुळे शेतीला फटका बसला आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी पाऊस येणे हे त्याचे उदाहरण आहे. यामुळे अन्नसुरक्षा प्रभावित झाली असून अन्नधान्य आयात करण्याची वेळ आली आहे. केवळ शेती नाही तर हवामान बदलाच्या प्रत्येक घडामाेडीमुळे मॅनुफॅक्चरिंग, रिटेल, टूरिझम, बांधकाम क्षेत्र, ट्रान्सपाेर्ट उद्याेगालाही फटका सहन करावा लागताे आहे आणि या घटनांचे सातत्य वाढले आहे. ही खरी धाेक्याची घंटा आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आकलनापेक्षा किती तरी अधिक असण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

देशात ५० वर्षांत ३५० माेठ्या घटना

- १९९० ते २०२० पर्यंत सरासरी १.५ डिग्री तापमान वाढले.

- १९७० ते २०२० दरम्यान देशात हवामान बदलाच्या ३५० घटना घडल्या.

- त्सुनामी, मुंबईचा महापूर, केरळचा महापूर, चेन्नई पूर, केदारनाथ भूस्खलन, लेह भुस्खलन, पूर्व-पश्चिम दिशेची भारतीय वादळे, उष्ण लहरी, थंड लहरी.

- भारतातील ७५ टक्के जिल्हे हे क्लायमेट हॉटस्पॉट आहेत.

- देशातील २७ टक्के भूभागावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे.

- मागील १५ वर्षांत ७९ जिल्हे हे दुष्काळ प्रभावित आणि २६ जिल्हे वादळे प्रभावित झाले आहेत.

भारताची स्थिती काय?

- भारताचा जागतिक हवामान बदल जोखीम निर्देशांक ७ वा आहे.

- भारताचा हवामान आपत्ती निर्देशांक ३ रा आहे.

-भारताचे गेल्या २० वर्षांत ७९.५ बिलियन डॉलरचे नुकसान झाले.

- भारताचे अति पावसामुळे १० बिलियन डॉलरचे नुकसान झाले.

- ‘काॅस्ट ऑफ क्लायमेट रिस्क इन इंडिया’च्या अहवालानुसार भविष्यात देशाचा दरवर्षी २.६ टक्के जीडीपी कमी होईल.

- १ डिग्री तापमान वाढीमुळे देशाचा ३ टक्के जीडीपी कमी होऊ शकतो. २०५० पर्यंत ४ टक्के जीडीपी कमी होण्याचा धोका.

 

देशातील कमी होत चाललेले जंगल, वाढलेले प्रदूषण आणि शहरीकरण यामुळे हवामान बदलाची गती वाढली आहे. देशाच्या एकूणच प्रगतीत हवामान बदल अडसर ठरत असून एकूण जीडीपीचे २% नुकसान होत आहे. आपण त्वरित हवामान बदल रोखू शकलो नाही तर देशाच्या सर्वच क्षेत्राचे, विशेषतः कृषी, आरोग्य आणि पर्यटन उद्योगाचे फार नुकसान होणार आहे.

- सुरेश चाेपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट साेसायटी

टॅग्स :pollutionप्रदूषण