शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

हवामान बदलाचे महाराष्ट्रातील शेतीवर गंभीर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:08 AM

निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामान्य माणसांना लक्षात येत नसले तरी एकूणच हवामानात गंभीर स्वरूपाचे बदल घडून ...

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामान्य माणसांना लक्षात येत नसले तरी एकूणच हवामानात गंभीर स्वरूपाचे बदल घडून येत आहेत. काेणत्याही ऋतूमध्ये अचानक हाेणारा अवकाळी पाऊस, तापमानात भरमसाठ वाढ हे सर्व हवामान बदलाचे संकेत हाेत. हाेत असलेल्या या जलवायू परिवर्तनामुळे महाराष्ट्रातील शेतीवर गंभीर स्वरूपाचे संकट ओढवणार असून बदलती पर्जन्यवृष्टी व तापमान वाढीमुळे येत्या २०५० पर्यंत विविध भागातील प्रमुख पिकांच्या उत्पादनात २० ते ५० टक्के घट हाेणार असल्याचा शास्त्रीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

बारामती येथील भूगाेल विषयाचे प्राध्यापक डाॅ. राहुल ताेडमल यांनी केलेल्या हवामान बदलाच्या शास्त्रीय अभ्यासातून ही गंभीर शक्यता मांडली आहे. त्यांनी पुण्याच्या मेटरालाॅजी विभागाकडून प्राप्त हवामान अंदाजाच्या सांख्यिकी सामग्रीच्या सहायाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व काेकण भागातील परिस्थितीचा अभ्यास करून अमेरिकन संख्याशास्त्रीय विश्लेषणातून हा अंदाज मांडला आहे. स्विर्त्झलॅन्डमधील ‘प्युअर अँड अप्लाइड जीओफिजिक्स’ या मासिकात हा शाेध निबंध प्रकाशित झाला आहे.

यानुसार डाॅ. ताेडमल यांनी २०५० ते पुढचे ८५ वर्ष म्हणजे २१०० पर्यंतचे अंदाज मांडले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत तापमानात ०.५ ते २.५ अंशाची वाढ हाेइल आणि २०३३ नंतर ही वाढ प्रकर्षाने जाणवेल. विशेषत: मध्य महाराष्ट्र व काेकणात तापमान असह्य ठरेल. येणाऱ्या पाच दशकात वर्षाच्या सरासरी तापमानात ८० टक्के वाढ हाेइल. या तापमान वाढीमुळे प्रमुख पिकांपैकी विदर्भ व काेकणातील तांदूळ, विदर्भातील कापूस व संत्रा तसेच इतर भागातील ज्वारी, ऊस, कांदा, मका, कडधान्य यांच्या उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम हाेतील.

पर्जन्यवृष्टीत धाेक्याचे संकेत

- २१०० पर्यंत विदर्भ व पश्चिम घाटात पाऊस ८२ ते २२५ मिमीने वाढेल.

- २०५० पर्जन्यमानात १८ ते २२ टक्के वाढ.

- ढगफुटीच्या रूपाने मागील वर्षी अनुभवलेली पूर स्थितीची पुनरावृत्ती राज्यभरात वारंवार पाहायला मिळेल.

--------------

पिके संवेदनशील जिल्हे (२०५० पर्यंत हाेणारी तापमान वाढ पिकांवरील परिणाम)

-ज्वारी : सातारा, पुणे, मावळ, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा १.१५ ते १.६ अंश उत्पादन क्षमतेत १८ टक्के घट

-ऊस : पुणे, साेलापूर, सांगली, काेल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, परभणी १.५ ते २.५ २२ टक्के घट

-तांदूळ : भंडारा, चंद्रपूर, रत्नागिरी, काेकण, रायगड, मावळ १.५ ते २.५ अंश ४९ टक्केपर्यंत घट

-कापूस : बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड ०.९ ते १.५ अंश प्रतिहेक्टर २६८ किलाे घट

-बाजरी : सातारा, नंदूरबार, धुळे, वाशिम, पुणे, जालना, औरंगाबाद १.५ ते १.६ अंश ३४ अंशापेक्षा अधिक तापमानात बाजरीच्या उत्पादकतेत घट येईल.

नागपूरचे तापमान ०.७ ते २ अंशाने वाढले

नीरीच्या २०१८-१९ च्या अहवालानुसार नागपूरच्या तापमानात १८७० ते २०१८ या १४८ वर्षाच्या काळात तापमानात ०.७ अंशाने वाढ झाली आहे. दुसऱ्या एका अंदाजानुसार गेल्या २० वर्षात तापमानात २ अंशाने वाढ झाली आहे. नागपूर हे ‘अर्बन हिट आयलँड’ हाेणे त्याचाच परिणाम आहे. पर्जन्यमान व हिवाळ्याच्या पॅटर्नमध्येही माेठा बदल जाणवत आहे.