शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 12:24 IST

पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे.

ठळक मुद्देरेल्वेकडून मिळू लागले ३० रॅक

नागपूर : कोळशाच्या भीषण तुटवड्याचा सामना करीत असलेल्या महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रासाठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वेकडे रिकाम्या रॅकची उपलब्धता वाढल्यामुळे कोळशाच्या आयातीत सुधारणा झाली आहे. पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे.

महाजनकोचा दावा आहे की, गेल्या तीन दिवसात त्यांना सरासरी १ लाख ३५ हजार मेट्रिक टनाची आवक होत आहे. याशिवाय रस्ते मार्गाने दुर्गापूरवरून ६ हजार आणि भटाडी खाण येथून ८ हजार मेट्रिक टन कोळसा मिळू लागला आहे. गोडेगाव आणि इंदर खाणीतून कोराडी, खापरखेडा वीज केंद्राला ४ हजार मेट्रिक टन कोळसा मिळत आहे. परंतु महाजनकोच्या सूत्रांचा दावा आहे की, ही आवक सतत सुरु राहिल्यास समस्या सुटणार आहे. कंपनीसमोर वीज उत्पादन करणे आणि पावसाळ्यात स्टॉक तयार ठेवणे असे दुहेरी आव्हान आहे.

कोठे किती स्टॉक ?

केंद्र            किती दिवसांचा कोळसा

कोराडी            १.७५ दिवस

चंद्रपूर             ६ दिवस

खापरखेडा      ५.५ दिवस

नाशिक            १.५ दिवस

भुसावळ         १ दिवस

परळी             ५ दिवस

पारस             १.५ दिवस

चंद्रपुरात विक्रमी उत्पादन

भारनियमनाचा सामना करीत असलेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्राने या दरम्यान विक्रमी उत्पादन केले आहे. येथील ७ युनिट गेल्या २३ दिवसांपासून सातत्याने उत्पादन करीत आहेत. यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये संयंत्राच्या युनिटकडून सतत २१ दिवसापर्यंत उत्पादन करण्यात यश मिळविले आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी यासाठी कौतुक केले आहे.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटGovernmentसरकारelectricityवीज