शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

भाववाढ विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल

By admin | Published: July 24, 2016 2:08 AM

देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असून यामुळे जनता त्रस्त झाली आहे

उत्तर नागपुरात आंदोलन : गरिबांवर अन्याय कशासाठी ? नागपूर : देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असून यामुळे जनता त्रस्त झाली आहे. शासनाचे साठेबाजीवर नियंत्रण नसल्यामुळे त्याचा परिणाम गरीब व मध्यमवर्गीयांवर होत आहे. त्यामुळे महागाईच्या विरोधात नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात शनिवार बाजारपेठ कमाल चौकात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीने माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शहर ्ध्यक्ष विकास ठाकरे, सेवादलाचे संघटक कृष्णकुमार पांडेय, नगरसेवक संदीप सहारे, मिलिंद चवरे, खुशाल हेडाऊ, मिलिंद सोनटक्के, प्रा.डॉ. जयंत जांभुळकर, नगरसेवक सुरेश जग्याशी, भावना लोणारे, महेंद्र बोरकर, सिंधू उईके, आमीर नूरी, आसीफ शेख, विजयालक्ष्मी हजारे, सलीम खान आदींनी भाग घेतला. यावेळी कुणाल राऊत यांनी महागाईच्या विरोधात सत्ताधारी भाजप सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था अनियमित झाली आहे. पूर्वी १०० रुपयात भरणारी भाजीपाल्याची पिशवी आज ६०० रुपयातही भरत नाही. सामान्य जनतेला डाळ व भाजीपाल्यापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र शासन रचत आहे. शासन वचननाम्यात फोल ठरल्याची टीका त्यांनी केली. आंदोलनात सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान महिलांनी भाववाढविरोधातील अ‍ॅप्रॉन घालून कांदा, भेंडी, मिरचीच्या माळा टाकून महागाईचा विरोध करीत जनजागृती केली. काँग्रेस सरकार सत्ताधारी भाजप सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्यशिवाय राहणार नसल्याचे नगरसेवक संदीप सहारे यांनी सांगितले. आंदोलनात उना गावात दलितांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आला. जनजागृती अभियानात युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेसचे विनोद सोनकर, हरिभाऊ किरपाने, माजी नगरसेवक मार्टिन मोरेश, हिरा गेडाम, मन्सूर खान, ममता गेडाम, तुषार नंदागवळी, सलीम मस्ताना, गौतम अंबादे, किरण यादव, बेबी गौरीकर, इरशाद शेख, राकेश निखार, राकेश निकोसे, खतीजा अली, प्रीतेश पाटील, मोसीन खान, आशिष साखरे, जय मोरयानी, अरमान खान, ममता सयाम, सुनंदा राऊत आदी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)