शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळली; आशिष देशमुखांचा प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 1:17 PM

महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणात नाराजी

नागपूर : राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर उमटलाय. काल काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परराज्यातील नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. तर, आज काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

काँग्रेसनं महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली त्यामुळं पक्षात मोठया प्रमाणात नाराजी आहे, बदल होत असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र, याच प्रकारचे निर्णय होत असतील तर सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच्या निर्णयाबाबत जो प्रश्न पडलाय तोच प्रश्न मलाही पडू लागला आहे, असे आशिष देशमुख यावेळी म्हणाले. 

इम्रान प्रतापगढी यांच मूळ नाव इम्रान खान हे आहे, मात्र ते प्रतापगढी लावतात. ते एक कव्वाल आहेत, त्यांना उत्तर प्रदेश सोडून महाराष्ट्रात उमेदवारी दिली यामुळं काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि आमच्यासारखे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढविली. यात साडेसहा लाखांपेक्षा अधिक मतांनी ते पराभूत झाले, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, आता त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली त्यामुळं मोठया प्रमाणात नाराजी आहे, असे देशमुख म्हणाले. 

देशमुख यांनी एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केला. एक पद एक व्यक्ती’ आणि एका कुटुंबात एका सदस्याला उमेदवारी ही सर्व कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. मग, पी. चिदंबरम यांचा मुलगा लोकसभेत असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली? प्रमोद तिवारी यांची मुलगी आमदार असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. ५० वर्षावरील नेत्यांना तिकीट देणार नाही असा निर्णय झाला असताना १५ दिवसात या निर्णयाला तिलांजली दिली, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. 

याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करू. मात्र, वारंवार हे होत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बघावं तरी कोणाकडे, हा प्रश्न उपस्थित होतोय. या सर्व कारणांमुळे मी प्रदेश काँग्रेसच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे, असे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान पदाचा राजीनामा देत असलो तरी पक्ष सोडणार नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाAshish Deshmukhआशीष देशमुख