शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

"काँग्रेसने जातीवादावर मते मागितली" : चंद्रशेखर बावनकुळे

By कमलेश वानखेडे | Updated: June 6, 2024 18:26 IST

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप : संविधान बद्दलवणार असा अपप्रचार केला

नागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जातीवादावर मते मागितली. इंडिया आघाडीकडून संविधान बदलवणार असा खोटा अपप्रचार करण्यात आला. जातीवाद राजनीती जिंकली. विकासाच्या राजनीतीचा पराभव झाला. भाजपने विकसित भारतासाठी मत मागितले, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

बावनकुळे म्हणाले, आता सोयीचा निकाल लागल्यामुळे महाविकास आघाडी ईव्हीएमवर बोलत नाही. हे खोटे बोलून मत घेतात. एकदा जनता भ्रमित झाली. नेहमी होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम केले. राज्यात घरकुल दिले, शेतकऱ्यांना सन्मान दिला, तरीही जनतेने काही क्षणासाठी दूर केले. महाविकास आघाडीने मुस्लिम, बौद्ध, आदिवासी समाजाला भीती दाखवण्याच काम केले. जातीच्या राजकारणात जनतेने मतदान केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या भावना दुखवल्या. आपण केंद्रीय नेतृत्त्वाला विनंती केली आहे की त्यांनी फडणवीस यांना सरकारमध्ये ठेवावे. फडणवीस यांनी काम केले. मात्र, त्यांच्याबाबात गैरसमज पसरविले गेले. ते थोडे कमजोर झाले. एक निवडणूक हरल्याने काही फरक पडत नाही. फडणवीस यांचा राजीनामा वरिष्ठ नेतृत्व स्वीकारणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदी देशाचे नेते आहेत. मतदानाचा टक्केवारीत आम्ही पुढे आहे, काही जागा कमी मतांनी हरलो, मागील वेळीच्या तुलनेत मत वाढले आहेत. महाविकास आघाडीचा विजय कपट कारस्थान शकुनी नितीने झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

राज्यात महायुतीच्या २०० जागा निवडून येतील- शुक्रवारी दिल्ली येथे संसदीय मंडळाची बैठक आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहोत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वणवण फिरून काम केले. महायुतीच्या उमेदवादारासाठी आम्ही ताकदीने लढलो आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांबद्दल कुणीच संभ्रम करू नये. आम्ही तिन्ही पक्ष आत्मचिंतन करून त्यात सुधारणा करू. राज्यात महायुतीच्या पुन्हा २०० जागा निवडून येतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस