शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
3
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
4
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
5
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
6
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
7
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
8
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
9
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
10
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
11
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
12
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
13
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
14
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
15
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
16
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
17
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
18
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
19
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
20
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू

मनपाकडे डेंग्यू नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:16 AM

नागपूर : उपराजधानीत सण-उत्सवाचे वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ...

नागपूर : उपराजधानीत सण-उत्सवाचे वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणले आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. परंतु महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात असल्याचे वास्तव आहे.

डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा ॲण्टीबायोटिक किंवा ॲण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो. सध्या पावसाची उघडझाप, घराघरात सुरू असलेले कूलर, उघड्या असलेल्या पाण्याच्या टाक्या, मोकळ्या प्लाॅटवर साचून असलेले पाणी, रस्ते व इतरही बांधकामासाठी साठवून ठेवलेले पाणी डेंग्यू डासाची उत्पत्तीचे केंद्र ठरत आहे. डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी बाराही महिने घराघरांचे सर्वेक्षण केले जाते. परंतु मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडे आधीच मनुष्यबळ कमी असताना त्यांच्याकडे ‘कोरोना’चीही जबाबदारी देण्यात आल्याने सर्वेक्षणच झाले नाही. जून महिन्यात रुग्णांची संख्या ८६ वर गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले.

-घराघराच्या सर्वेक्षणाचा फायदा कुणाला?

जून महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताच मनपाने १६ जुलैपासून घराघराच्या सर्वेक्षणाची विशेष मोहीम हाती घेतली. यात आतापर्यंत ६७ हजार २०२ घरे दूषित म्हणजे, डेंग्यू अळी आढळून आल्या. विशेष म्हणजे, जुलै महिन्यात दूषित घरांची संख्या ५ हजार ९२९ असताना ऑगस्ट महिन्यात या घराची संख्या ६७ हजारावर गेली. यामुळे या मोहिमेचा फायदा कुणाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जोपर्यंत दूषित घरावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत सर्वेक्षणाचा फायदा होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- दरवर्षी डेंग्यूचा फैलाव तरी प्रभावी योजना नाही

दरवर्षी पावसाळयात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्वकाळजी घेतली जात नाही. परिणामी यावर्षी रोगाने थैमान घातले आहे. आजार पसरू नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणाच नाही. दहा फॉगिंग मशीन असताना यातील दोन कित्येक महिन्यापासून बंद आहे. ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ आठ फॉगिंग मशीन फिरवून डेंग्यूवर नियंत्रण आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

- गरज ८०० ची, काम करीत आहेत २१० कर्मचारी

डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला ८०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु जवळपास २१० कर्मचारी काम करीत आहेत. हॅण्ड फॉगिंग किंवा कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने डेंग्यूवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

::डेंग्यू रुग्णांची स्थिती

महिना : रुग्ण

जानेवारी :०२,

फेब्रुवारी :०१

मार्च :०३

मे:०६

जून: ८६

जुलै :२५१

ऑगस्ट :२१६

(दि. २५ पर्यंत )