शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

मनपाची वृक्ष समिती अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:07 AM

नागपूर : अजनी वन संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणाऱ्या ॲड. श्वेता बुरबुरे व छायाचित्रकार ...

नागपूर : अजनी वन संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणाऱ्या ॲड. श्वेता बुरबुरे व छायाचित्रकार अजय तिवारी यांनी महानगरपालिकेची वृक्ष समिती अवैध असल्याचा दावा केला आहे.

या दोघांनी नवीन माहितीच्या आधारे जनहित याचिकेत दुरुस्ती करण्याची उच्च न्यायालयाला परवानगी मागितली आहे. त्यासंदर्भातील अर्जात यासह विविध मुद्दे उचलण्यात आले आहेत. मनपाची वृक्ष समिती २९ ऑगस्ट २०१७ रोजी स्थापन करण्यात आली असून, या समितीत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे सखोल ज्ञान असलेल्या अशासकीय प्रतिनिधीचा समावेश करणे आवश्यक आहे. परंतु, वर्तमान समितीत असा एकही प्रतिनिधी नाही. सर्व प्रतिनिधी राजकीय आहेत. ते वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे ज्ञान नसताना याविषयीचे निर्णय घेत आहेत. उच्च न्यायालयाने ‘रोहित जोशी’ प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार ही समिती अवैध आहे. त्यामुळे समितीने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही. याशिवाय महाराष्ट्र वृक्ष कायद्यामध्ये सुधारणा प्रस्तावित असून, राज्य सरकारने त्यासंदर्भात २४ जून २०२१ रोजी अधिसूचना जारी केली आहे. नवीन कायद्यात मनपाच्या वृक्ष समितीला वृक्षाविषयीच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्याकरिता राज्य वृक्ष समिती स्थापन केली जाणार आहे. करिता मनपाच्या वृक्ष समितीला अजनी वनाशी संबंधित प्रकरणांवर निर्णय घेण्यापासून थांबविणे आवश्यक आहे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

-------------------

वृक्ष प्रत्यारोपण केवळ धूळफेक

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने अजनी वनातील ४ हजार ९३० झाडांच्या प्रत्यारोपणासाठी १५ मे २०२१ रोजी मनपाच्या वृक्ष समितीकडे अर्ज सादर केला आहे. परंतु, मनपाच्या गणनेनुसार संबंधित परिसरात ६ हजार ९५५ झाडे आहेत. तसेच, नवीन वृक्ष कायद्यानुसार, झाडांचे प्रत्यारोपण त्याच ठिकाणी किंवा नजीकच्या सार्वजनिक जमिनीवर करणे आवश्यक आहे. महामार्ग प्राधिकरणच्या अर्जात याविषयी स्पष्टता नाही. त्यावरून वृक्ष प्रत्यारोपणाचा अर्ज केवळ धूळफेक असल्याचे स्पष्ट होते, असे याचिकाकर्त्यांनी अर्जात म्हटले आहे.

-----------------------

जमीन हस्तांतरण बेकायदेशीर

इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाकरिता रेल्वे प्रशासनाद्वारे महामार्ग प्राधिकरणला अजनी येथील ४४६ एकर जमीन हस्तांतरित केली जाणार आहे. यासंदर्भातील करारानुसार, हे हस्तांतरण थेट होणार आहे. सुरुवातीला ४५ वर्षांची व त्यानंतर ९९ वर्षांची लीज राहणार आहे. परंतु, कायद्यानुसार नोंदणीकृत दस्तावेजाशिवाय जमीन हस्तांतरण होऊ शकत नाही. परिणामी, संबंंधित करारावर अंमलबजावणी होऊ शकत नाही, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.