शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

नागपुरातील क्वारंटाईन सेंटरमधील प्रत्येक व्यक्तीवर होतो फक्त ५२ रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:07 AM

नागपुरातील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना मोफत जेवण व नाश्ता देण्याचा राधास्वामी सत्संग मंडळाने स्वत: दिलेला प्रस्ताव मनपाने स्वीकारला. एजन्सी दर दिवशी प्रत्येकी ५२ रुपये शुल्क घेत आहे.

ठळक मुद्दे जेवण आणि नाश्ता मोफत उपलब्धएसडीआरएफ फंडातून आतापर्यंत १.९२ कोटी खर्च

राजीव सिंह ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या लोकांवर सुरुवातीला प्रति व्यक्ती ६०० रुपये खर्च येत होता. तो आता कमी झाला असून प्रति व्यक्ती ५२ रुपये खर्च येत आहे. हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. शहरातील आठ क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या १९०० नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना दोन वेळ जेवण, नाश्ता, चहा दिला जातो.क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना मोफत जेवण व नाश्ता देण्याचा राधास्वामी सत्संग मंडळाने स्वत: दिलेला प्रस्ताव मनपाने स्वीकारला. मनपाने आता फक्त नाश्ता व जेवण पोहचवण्यासाठी एजन्सीची नेमणूक केली आहे. एजन्सी दर दिवशी प्रत्येकी ५२ रुपये शुल्क घेत आहे. येरला येथील मंडळाच्या स्वयंपाकघरातून शहरातील ८ क्वारंटाईन सेंटरवर वेळेवर जेवण व नाश्ता पोहोचवण्याची जबाबदारी एजन्सीवर आहे.

जेवण व नाश्त्यात हे मिळतेक्वारंटाईन सेंटरमध्ये सकाळी ८ ते ९ दरम्यान पोहे, आलूबोंडा वा उपमा दिला जातो. दुपारी १२ ते २ दरम्यान जेवण दिले जाते. जेवणात तीन पोळ्या, भाजी, भात व वरण दिले जाते. एखाद्याला जादाचे जेवण हवे असल्यास पुरविले जाते. सायंकाळी चहा, बिस्किटे दिली जातात. रात्री ८ ते ९ दरम्यान जेवण दिले जाते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस