शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

प्रशासनाकडून गंभीर चुका

By admin | Published: April 02, 2015 2:29 AM

मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून गंभीर चुका झाल्या, त्यामुळेच पाच खतरनाक कैदी कारागृहातून पळून जाऊ शकले,

नागपूर : मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून गंभीर चुका झाल्या, त्यामुळेच पाच खतरनाक कैदी कारागृहातून पळून जाऊ शकले, अशी स्पष्ट कबुली अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरूंग) मीरा बोरवणकर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांपुढे दिली. मंगळवारी पहाटे पाच खतरनाक कैदी मध्यवर्ती कारागृहातून पळून गेले. त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, आज सकाळी पुणे आणि बुलडाणा येथून दोन चौकशी पथके नागपूर कारागृहात सकाळीच पोहचली. खुद्द मीरा बोरवणकरही येथे आल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर दुपारी ४ वाजता त्या कारागृहात पोहचल्या. तब्बल साडेचार तास त्यांनी आतमध्ये पाहणी केली. बडी गोल, बराक क्रमांक ६, घटनास्थळ बघितल्यानंतर त्यांनी कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. रात्री ८.३० ला त्या कारागृहातून बाहेर पडल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचित केली असता त्या म्हणाल्या, मी आज घटनास्थळ बघितले. त्या रात्री कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याशी चर्चा केली. बराकीत त्या रात्री कोणता वार्डन होता, त्याची माहिती घेतली आणि घटना कशी घडली, त्याची माहिती घेतली. कारागृह प्रशासनाच्या चुकीमुळेच ही घटना घडली हे बरोबर आहे का, असा प्रश्न केला असता त्यांनी त्याला स्पष्ट दुजोरा दिला. प्रशासनाच्या गंभीर चुका झाल्या त्याचमुळे हे पाच कैदी पळून जाऊ शकले, असे त्या म्हणाल्या. कारागृहात अनेकदा मोबाईल, गांजा असे अमली पदार्थ आढळले होते, त्याची माहिती नव्हती का, या गैरप्रकाराला कोण दोषी आहे, असा प्रश्न केला असता त्यांनी मोबाईल गांजासह गैरप्रकार होत होते, याला दुजोरा दिला. मात्र, त्याला कोण किती दोषी आहे, ते आता सांगता येणार नसल्याचे बोरवणकर म्हणाल्या. या गैरप्रकाराबाबत तुमच्याकडे वेळोवेळी तक्रारी झाल्या, अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवले. तुमच्याकडून कारवाई का झाली नाही, अशी विचारणा केली असता त्यांनी यावर थेट बोलण्याचे टाळले. हे सर्वच अहवाल आपण गृहमंत्रालयाकडे पाठविल्याचे त्यांनी सागिंतले. (प्रतिनिधी)