शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

एक रुपयात पीक विमा; ‘जीआर’ येणार कधी? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2023 8:00 AM

Nagpur News संत्रा फळपीक विमा काढण्याची मुदत संपली असून, माेसंबी फळपीक आणि खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी राज्य सरकारने याबाबत ‘जीआर’ काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमानुसार हप्त्याच्या रकमेचा भरणा करून पीक विमा काढावा लागत आहे.

साैरभ ढाेरे

नागपूर : राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत खरीप व रबी पिके, तसेच फळपिकांचा विमा एक रुपयात काढण्यात येणार असल्याची घाेषणा केली हाेती. विम्याच्या हप्त्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याच्या रकमेचा भरणाही राज्य सरकार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले हाेते. संत्रा फळपीक विमा काढण्याची मुदत संपली असून, माेसंबी फळपीक आणि खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी राज्य सरकारने याबाबत ‘जीआर’ काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमानुसार हप्त्याच्या रकमेचा भरणा करून पीक विमा काढावा लागत आहे.

नरखेड, काटाेल, कळमेश्वर, सावनेर तालुक्यांतील संत्रा व माेसंबी उत्पादक फळपीक विमा काढतात, तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप व रबी पिकांचा नियमित विमा काढतात. केंद्र सरकारने नागपूर जिल्ह्यातील फळपिकांच्या शेतकऱ्यांच्या वाट्यात आधीच माेठी वाढ केली आहे. त्यातच राज्य सरकारने सर्व पीक विमा एक रुपयात काढण्याची घाेषणा केली. यासाठी ३,३१२ काेटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

याबाबत राज्य सरकारने अद्याप कुठलाही जीआर काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विम्याच्या हप्त्याची रक्कम भरून पीक विमा काढावा लागत आहे. विशेष म्हणजे, संत्रा फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख १४ जून हाेती, तर माेसंबी फळपीक विमा काढण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. शिवाय, खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक रुपयात पीक विमा याबाबत राज्य सरकारचा जीआर कुणालाही प्राप्त न झाल्याने ही याेजना केवळ कागदावरच असून, त्याचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आराेप शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मदन कामडे यांनी केला आहे.

नियमानुसार हप्ते भरा

बहुतांश शेतकरी पीककर्ज घेताना पीक विमा काढतात. एक रुपयात पीक विमासंदर्भात कुठलाही जीआर अथवा राज्य सरकारचा आदेश आपल्याला अद्याप प्राप्त झाला नाही. शेतकरी विचारणा करीत असल्याने आपण पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनाही याबाबत कुठलाही आदेश नाही. कंपनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपण शेतकऱ्यांकडून नियमानुसार विम्याच्या हप्त्याची रक्कम स्वीकारून पीक विमा काढत आहाेत, अशी माहिती राष्ट्रीयीकृत बँकांच्या काही व्यवस्थापकांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रुपयात पीक विमा ही घाेषणा केली; परंतु त्यांनी अद्याप जीआर काढला नाही. त्यामुळे आपण नियमानुसार विमा हप्त्याच्या रकमेचा भरणा करून संत्रा व इतर पिकांचा विमा काढला आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीने जीआर काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-चंद्रशेखर कोल्हे,

शेतकरी तथा माजी जि.प. सदस्य, काटाेल

 

संत्रा फळपीक विमा मागील वर्षीप्रमाणेच यंदाही काढावा लागला. विम्याच्या हप्त्यापाेटी चार हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे दाेन हेक्टरचे आठ हजार रुपये विमा कंपनीला दिले. हा संत्र्याच्या मृग बहाराचा विमा आहे. आंबिया बहारासाठी वेगळा विमा काढावा लागणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टर २० हजार रुपयांचा हप्ता विमा कंपनीला द्यावा लागेल.

-मनाेज जवंजाळ,

संत्रा उत्पादक शेतकरी, काटाेल

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र