शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली की संस्कृतीचा ऱ्हास होतो

By admin | Published: January 13, 2015 1:03 AM

प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे याला विकास म्हणतात. आज चंगळवाद व सुधारणेच्या नावाखाली प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकृतीचा ऱ्हास होत आहे. यासाठी नीतीचे बंध घालणे

भरतबुवा रामदासी : नीतीचे बंध घालणे आवश्यकनागपूर : प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणे याला विकास म्हणतात. आज चंगळवाद व सुधारणेच्या नावाखाली प्रकृतीमध्ये विकृती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकृतीचा ऱ्हास होत आहे. यासाठी नीतीचे बंध घालणे आवश्यक असल्याचे विचार ह.भ.प. भरतबुवा रामदासी महाराज यांनी केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती व राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने चिटणीस पार्कवर सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवाचे चौथे पुष्प त्यांनी गुंफले. त्यांचा कीर्तनाचा विषय देव, देश आणि धर्मावर नितांत प्रेम करणाऱ्या राजे संभाजी महाराज हा होता. आपल्या कीर्तनात त्यांनी विकृती आणि संस्कृतीतील तुलना केली. विकृती जीवन बिघडविते तर संस्कृती जीवन घडविते. विकृती देवाला दगड तर संस्कृती दगडाला देव बनविते. आज सुधारणेच्या नावाखाली संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. प्रगती ही जगण्याला आवश्यक आहे. पण ती नैतिक मूल्याच्या अधिष्ठानावर असायला पाहिजे. जगाकडे बघितल्यानंतर लक्षात येते की, हे संपूर्ण जग अपूर्णतेने ग्रासलेले, विसंगतीने माखलेले, संघर्षानी फाटलेले, दुभंगलेले, विनाशाने ओढवलेले आहे. मानवी जीवनाची उत्क्रांती करायची असेल तर धर्माची नितांत गरज आहे. धर्माचे चिंतन मांडताना भरतबुवा म्हणाले, धर्म ही जीवनपद्धती आहे. प्रत्येक धर्मात तत्त्वमीमांसा, आचारसंहिता असते. हे सर्व विसरून आंधळी कवायत करण्याकडे माणसाचा कल दिसून येत आहे. संभाजी राजांनी देश, देव व धर्मावर नितांत प्रेम केले. त्यासाठी बलिदान दिले. धर्माने कधीही द्वेष, मत्सर शिकविला नाही. धर्म सांगतो आपापले कर्म परमेश्वराला आवडेल असे करा. आज कीर्तन महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी छोटे बालकदास महाराज, आ. मिलिंद माने, उद्योजक विलास काळे उपस्थित होते. आजची आरती रवींद्र भोयर व मदन अडकिने यांच्याहस्ते झाली. (प्रतिनिधी)