शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

कोळसा संकटावर सध्या ‘ब्रेक’; वीज केंद्रांमध्ये वाढला साठा; पुरवठ्यातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 07:15 IST

Nagpur News परळीसोडून इतर वीज केंद्रातील कोळसा साठा अजूनही संवेदनशील स्थितीत आहे. परंतु परिस्थिती सुधारत असल्याने वीज केंद्र लवकरच यातूनही बाहेर येईल, असा महाजेनकोचा दावा आहे.

कमल शर्मा

नागपूर : मान्सून सुरू होताच राज्यातील औष्णिक वीज केंद्रासमोर उभे ठाकलेले कोळशाचे संकट सध्यातरी टळले आहे. परळीसोडून इतर वीज केंद्रातील कोळसा साठा अजूनही संवेदनशील स्थितीत आहे. परंतु परिस्थिती सुधारत असल्याने वीज केंद्र लवकरच यातूनही बाहेर येईल, असा महाजेनकोचा दावा आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, टळलेले संकट हे तात्पुरते आहे. पुढील मान्सूनमध्ये ही समस्या होऊ नये म्हणून महाजेनकोला आतापासूनच पाऊल उचलावे लागेल.

राज्यातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा साठा अतिशय कमी झाला होता. १२ पेक्षा अधिक वीज युनिटमधील उत्पादन थांबले होते. पॉवर एक्सचेंजमधून १५ रुपये प्रति युनिटच्या दराने वीज खरेदी करून पुरवठा करण्याची वेळ आली होती. परंतु सध्या राज्यातील परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. अजूनही पाच युनिट बंद आहेत, मात्र ते कोळशामुळे नाहीत. महाजेनकोचे म्हणणे आहे की, कोळसा खाणीमध्ये पाणी जमा झाल्याने पुरवठा प्रभावित झाला होता. पाऊस थांबताच कोळशाचा पुरवठाही पुन्हा वाढला आहे. पुरवठा वाढल्याने खाणीतून सायडींगपर्यंत कोळसा आणण्याची जबाबदारी आरसीआर (रस्ते व रेल्वे) वाहतुकीच्या माध्यमातून महाजेनकोने स्वत: उचलली आहे. यामुळे खर्च वाढला मात्र कोळशाचा पुरवठा व्यवस्थित झाला. आता वीज केंद्रांमध्ये २ लाख ६० हजार मेट्रिक टनपेक्षा अधिकचा कोळसा साठा आहे. पूर्व तो २ लाख मेट्रिक टन इतका होता.

दर दहाव्या दिवशी २०० कोटी

कोळसा पुरवठ्यात सुधारणा व्हावी, यासाठी महाजेनको आता कोळशाची थकीत रक्कम अदा करण्यासही प्राधान्य देत आहे. २५०० कोटीची थकबाकी चुकविण्यासाठी कंपनी दर दहाव्या दिवशी वेकोलिसह इतर कोळसा कंपन्यांना २०० कोटी रुपयाचे देणे देत आहे.

वीज केंद्र - इतक्या दिवसाचा साठा

कोराडी (६६०) - १

कोराडी (२१०) -१.५

नाशिक - २

भुसावळ - १.५

परळी - ४.२५

पारस - ३

चंद्रपूर - १.२५

खापरखेडा - १.५

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकट