शहरं
Join us  
Trending Stories
1
काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंनी दिलगिरीचे पत्र दिले; म्हणाले, सभागृहातही तयारी....
2
“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत
3
Hathras Stampede : योगी आदित्यनाथांनी दिला हाथरस चेंगराचेंगरीचा ग्राउंड रिपोर्ट!
4
सालाबादप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना आजपासून टोलमाफ; कसा मिळवणार? कधीपर्यंत...
5
लग्नाला विरोध केल्याने डॉक्टर प्रेयसीने त्याचे गुप्तांग कापले; तिने रडत रडत पोलिसांना फोन केला पण...
6
मणिपूरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत दिली महत्त्वाची माहिती, काँग्रेसलाही सुनावले
7
'घोटाळा करणारे AAP चे, तक्रार करणारे काँग्रेसचे अन् शिव्या मोदीला', पंतप्रधानांचा हल्लाबोल
8
Team India Return From Barbados: एअरपोर्टवर लँडिंग, मोदींशी भेट अन् मुंबईत 'जल्लोष', मायदेशी 'असं' होणार टीम इंडियाचं स्वागत
9
राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट; PM मोदी म्हणाले, "खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत"
10
कंगना राणौतला चापट मारणाऱ्या महिला CISF कॉन्स्टेबलसह तिच्या पतीची बदली...
11
“समृद्धी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची तुटपुंजी मदत देऊन बोळवण”; वडेट्टीवारांची टीका
12
'क्रिश' सिनेमातला 'छोटा कृष्णा' झालाय मोठा, अभिनयाला केला रामराम, आता ओळखूही शकणार नाही!
13
Video: हुश्श...! भारतीय संघ वर्ल्डकप घेऊन निघाला; दुबेने बारबाडोसमधून फोटो पोस्ट केला
14
पैशांची अचानक गरज भासली तर काय करावं? FD तोडावी की त्यावर लोन घ्यावं, कशात आहे फायदा
15
Hathras Stampede : "मी प्रलय आणू शकतो, अधर्माचा नाश करेन"; चक्र दाखवून देव असल्याचं नाटक करायचे भोले बाबा
16
‘१० झाली, अजून २० वर्षे बाकी’, काँग्रेसच्या एक तृतियांश सरकार टीकेला मोदींचं प्रत्युत्तर  
17
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची स्वप्नपूर्ती, शेतात बांधला टुमदार बंगला, फोटोतून दाखवली झलक
18
केतु नक्षत्र गोचर: ५ राशींना इच्छापूर्ती काळ, बचत करणे शक्य; नोकरीत लाभ, गुंतवणुकीतून फायदा
19
डोळ्यात साठवून ठेवावा असा क्षण! 'चॅम्पियन' रोहित-विराटची गळाभेट; Unseen Video Viral
20
विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज? माजी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

धरणे कोरडी,नागपूर जिल्ह्यावर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 10:46 PM

मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणी साठामे महिन्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला केवळ २८३ दलघमी(८ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ १५ दलघमी म्हणजे २ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३८ दलघमी (२७ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये १० टक्के, लोवर नांद १ टक्के, वडगाव प्रकल्पात १९ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २० टक्के, सिरपूर २२ टक्के, पुजारी टोला २१ टक्के, कालिसरार ५० टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ८ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३२ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये १० टक्के, पोथरामध्ये १ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ६ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.गोसेखुर्द व दिना रिकामेभंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ आणि गडचिरोली जिल्ह्यातील दिना हे दोनही प्रकल्प पूर्णपणे रिकामे आहेत. गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा क्षमता ७४० दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला पाणीच नाही. तर दिना प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ६८ दलघमी इतकी असून ते सुद्धा रिकामेच आहे.मध्यम व लघु प्रकल्पांची स्थितीही बिकटनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारची धरणे आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. त्यात २ एप्रिल रोजीपर्यंत केवळ ८० दलघमी म्हणजेच १५ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ६१ दलघमी म्हणजेच १२ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.पाच वर्षात सर्वात कमी साठानागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केला असता मागील पाच वर्षात यंदा सर्वात कमी पाणीसाठा आबहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी २०१८ मध्ये २ मे रोजी मोठ्या धरणांमध्ये ८९४ दलघमी इतका साठा होता. २०१७ मध्ये याच तारखेला ५०५ दलघमी इतका पाणीसाठा होता. २०१६ मध्ये ८७२, २०१५ मध्ये ९३० आणि २०१४ मध्ये १६२० दलघमी इतका साठा होता. आणि यंदा केवळ २८३ दलघमी इतका साठा आहे. त्यामुळे कधी नव्हे इतकी परिस्थिती भयावह झाली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण