शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

४०९ कलमावरील आक्षेपावर आज निर्णय

By admin | Published: January 05, 2016 3:28 AM

श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी दाखल भारतीय दंड विधानाच्या कलम ४०९ विरुद्ध बचाव पक्षाने घेतलेल्या

नागपूर : श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूकप्रकरणी दाखल भारतीय दंड विधानाच्या कलम ४०९ विरुद्ध बचाव पक्षाने घेतलेल्या आक्षेपावर उद्या मंगळवारी एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात निर्णय होणार आहे. तसेच समीर जोशीसह सर्व अकराही आरोपींविरुद्ध आरोप निश्चित होणार आहेत. या प्रकरणी भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, २०१, १२० ब, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्तसंबंध) संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ आणि भारतीय रिझर्व्ह बँक कायद्याच्या ४५ एस, ५८ ब अन्वये गुन्हे दाखल आहेत. एकूणच दाखल कलमांपैकी ४०९ मध्येच जन्मठेपेच्या शिक्षेचे प्रावधान आहे. अन्य कलमांमध्ये केवळ सहा ते सात वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान आहे. समीर जोशी याचे वकील अ‍ॅड. सुभाष घारे यांनी ४०९ या कलमाविरुद्ध आक्षेप घेऊन हे कलम काढण्याची मागणी केली. समीर जोशी हा सरकारी नोकर नाही आणि एजंटही नाही. त्याच्याकडे गुंतवणूकदारांनी विशिष्ट उद्देशासाठी आपापली मालमत्ता गुंतवली होती, म्हणून या प्रकरणात ४०९ हे कलम बसत नाही. यावर विशेष सरकारी वकील अ‍ॅड. बी. एम. करडे यांनी असा युक्तिवाद केला की, श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी याच्याकडे गुंतवणूकदारांनी मोठ्या विश्वासाने आपापली मालमत्ता गुंतवली होती. तो या मालमत्तेचा विश्वस्त आहे, त्याने गुंतवणूकदारांचा विश्वासघात केला आहे. करडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी आणि न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी वासनकर प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा आणि हर्षद मेहता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचा आधार घेतला. न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकूण उद्यापर्यंत निर्णय राखून ठेवला. न्यायालयात मंगळवारीच समीर जोशी, पल्लवी जोशी, श्रीकांत प्रभुणे, निशीकांत मायी, दिलीप डांगे, मोहन पितळे, मुकुंद पितळे, नितीन केसकर, शंतनू कुऱ्हेकर, आनंद जहागीरदार आणि मनोज तत्वादी, अशा ११ जणांविरुद्ध आरोप निश्चित होणार आहेत. आरोपींपैकी समीर जोशी आणि तत्वादी यांना अद्यापही जामीन झालेला नाही.सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित गोविंद मोरे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी समीर जोशी, पल्लवी जोशी व इतरांविरुद्ध १४ सप्टेंबर २०१३ रोजी गुन्हे दाखल केले होते. आतापर्यंत १२४४ गुंतवणूकदार पुढे आले असून फसवणुकीची रक्कम १०० कोटींच्यावर गेलेली आहे. (प्रतिनिधी)आणखी पाहिजे ७० आरोपीश्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या अर्थिक गुन्हे पथकाला आणखी ७० आरोपी पाहिजे आहेत. त्यापैकी ३ आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी एमपीआयडी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. विनोद मायी, विनय दुबे आणि मधुश्री बल्लाळ, अशी आरोपींची नावे असून ते सर्व श्रीसूर्या समूहाचे एजंट होते. या आरोपींपैकी विनोद मायी याने ५५ लाख, बल्लाळने ९७ लाख आणि दुबे याने ३५ लाखांचे कमिशन लाटलेले आहेत. या तिघांच्या अर्जावर १५ जानेवारी रोजी निर्णय होणार आहे. येत्या दिवसात या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आरोपी अटक होण्याची चिन्हे दिसत आहेत.