शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

अनुकंपा नोकरीची मागणी तातडीने करणे आवश्यक - हायकोर्ट 

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 25, 2023 3:40 PM

विलंब केल्यामुळे मुलीला दिलासा नाकारला

नागपूर : अनुकंपा नोकरीची मागणी तातडीने करणे आवश्यक आहे. दीर्घ काळानंतर दावा करणाऱ्याला नोकरी दिली जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला. सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला नोकरी देण्यासाठी ही योजना आहे. पीडित कुटुंबाची हालअपेष्टा होऊ नये व त्याला तातडीने आर्थिक आधार मिळावा, हा अनुकंपा नोकरीच्या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे या नोकरीसाठी तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. नोकरी मागण्यास विलंब केल्यास योजनेचा उद्देश बाधित होतो, असे न्यायालयाने सांगितले.

अनुकंपा नोकरी मागण्यास विलंब करणाऱ्या विवाहित मुलीला या निर्णयाद्वारे दिलासा नाकारण्यात आला. राजश्री खोपे, असे मुलीचे नाव आहे. त्यांचे वडील माणिक भातकुलकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अमरावती मंडळात कार्यरत होते. भातकुलकर यांचे ८ जुलै १९९८ रोजी निधन झाले. मुलगी २००५ मध्ये सज्ञान झाली होती. परंतु, तिने नोकरी मागण्यासाठी १४ वर्षाचा विलंब केला. तसेच, सध्या तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर २४ वर्षे लोटली आहेत. त्यामुळे तिची नोकरीची मागणी अमान्य करण्यात आली.

आधी आईने केला होता दावा

आधी मुलीच्या आईने ९ फेब्रुवारी १९९९ रोजी अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांना नाेकरी देण्यात आली नाही. दरम्यान, वयाची ४५ वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांचे नाव प्रतीक्षा यादीतून वगळण्यात आले. परिणामी, मुलीने १६ डिसेंबर २०१९ रोजी अर्ज करून नोकरी देण्याची मागणी केली. त्यावरही काहीच निर्णय घेण्यात आला नाही. करिता, मुलीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयjobनोकरी