शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जामऐवजी वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याची मागणी नामंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:42 IST

Nagpur : हायकोर्टाने फेटाळून लावली जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समुद्रपूर तालुक्यातील जाम ऐवजी वर्धा शहरामध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला.

सुरेश दुधे यांनी ही याचिका दाखल केली होती. सुरुवातीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे हे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर झाले होते. परंतु, त्याकरिता आवश्यक जमीन मिळाली नाही. परिणामी, सप्टेंबर-२०२४ मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने हिंगणघाटजवळच्या जाम शहरात हे महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाम येथे कृषी विभागाची ४० एकर जमीन उपलब्ध आहे. या महाविद्यालयात एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या १०० जागा राहणार असून रुग्णालयात ४३० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वर्धा येथे आधीच सुविधावर्धा शहरात आधीच जिल्हा रुग्णालय आहे. तसेच, शहराजवळच्या सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यरत आहे. त्यामुळे वर्धा येथे पुन्हा नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची गरज नाही, अशी भूमिका केंद्र व राज्य सरकारने उच्च न्यायालयासमक्ष मांडली. न्यायालयाला या मुद्द्यामध्ये तथ्य आढळून आले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयwardha-acवर्धा