शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आदिवासी जात वैधता समितीचे उपायुक्त निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 20:35 IST

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना आदिवासी विकास विभागातील जात वैधता समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांना निलंबित करण्याचे निर्देश द्यावे लागले. सर्वपक्षातील सदस्यांनी जगताप यांच्या निलंबनाची तीव्रतेने मागणी केल्यानंतरही सवरा हे चौकशीनंतर कारवाई करण्यावर अडून होते. तेव्हा अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागला.

ठळक मुद्देआदिवासी विकास मंत्र्यांचा निर्णय : सीआयडी चौकशीही होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना आदिवासी विकास विभागातील जात वैधता समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांना निलंबित करण्याचे निर्देश द्यावे लागले. सर्वपक्षातील सदस्यांनी जगताप यांच्या निलंबनाची तीव्रतेने मागणी केल्यानंतरही सवरा हे चौकशीनंतर कारवाई करण्यावर अडून होते. तेव्हा अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागला.अतुल सावे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना सदर केली होती. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण सेवक प्रशांत बार्लावार यांनी आदिवासी असल्याचे जात वैधता प्रमाणपत्रासाठी २००३ मध्ये अर्ज केला होता. परंतु त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. अखेर त्यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत प्रमाणपत्र देण्यात यावे, असे निर्देश दिले. त्यानंतरही त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. बार्लावार यांचे नातेसंबंधातील सर्वांकडे जात वैधता प्रमाणपत्र असूनही त्यांना मात्र नाकारण्यात आले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी यासाठी जगताप यांना दोषी धरीत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. ते म्हणाले, जगताप यांनी ५०० ते ६०० कोटी रुपयाची संपत्ती जमविली आहे. एसीबीमार्फत याची चौकशी व्हावी. सवरा यांनी यावर एसीबी मार्फत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अनेक सदस्यांनी जगताप यांच्याबाबत असलेल्या तक्र्रारींचा पाढा वाचत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. परंतु आदिवसी विकास मंत्री कारवाई करण्यास मागेपुढे पाहत होते. अखेर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना स्वत: हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी सवरा यांना विचारले की ‘तुम्ही अधिकाऱ्याची पाठराखण का करीत आहात? त्यांच्याकडेही जगताप यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. तेव्हा जगताप यांना आजच्या आज निलंबित करा आणि सीआयडी मार्फत चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर सवरा यांनी निलंबित करीत सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली.रक्ताचे नाते वैधतेचा आधार नाहीसामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्यात जात वैधता प्रमाणपत्राबाबत वेगवेगळे नियम आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यांनी गुरुवारीच विधानसभेमध्ये सांगितले होते की, रक्ताचे नाते असलेल्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर दुसºयांदा इतर कागदपत्रांची गरज नाही. आज विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नावर सवरा यंनी सांगितले की, रक्ताचे नाते हे आदिवासींसाठी जात वैधतेचा आधार नाही.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८vishnu savaraविष्णू सावरा