शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

४० कोटी खर्च करूनही अनेक रस्त्यांवर अंधार

By admin | Published: September 13, 2015 2:50 AM

पथदिव्याच्या देखभाल दुरुस्तीला पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ देत यावर ६ कोटी ७८ लाखाचा खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

कंत्राटदाराला मुदतवाढ : २६ हजार एलईडी केव्हा बसणारनागपूर : पथदिव्याच्या देखभाल दुरुस्तीला पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ देत यावर ६ कोटी ७८ लाखाचा खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गेल्या तीन वर्षात पथदिव्यांवर ४० कोटीचा खर्च करूनही शहरातील अनेक रस्त्यावर रात्रीला अंधार असूनही ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामासाठी पैसे नाही. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. असे असे असतांना रस्त्यावरील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात कंत्राटदाराकडून किती पथदिवे दुरुस्त करण्यात आले याची माहिती मनपाच्या विद्युत विभागाकडे नाही. स्थायी समितीलाही याची माहिती देण्यात आलेली नाही. असे असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. शहरात १ लाख २६ हजारांवर पथदिवे आहेत. रात्रीच्या सुमारास यामुळे वाहनचालकांना मदत होते. यातील २६ हजार पथदिवे एलईडी करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र अद्याप ५० टक्केही एलईडी दिवे बसलेले नाही. पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्षाचे कंत्राट देण्यात आले होते. ३० सप्टेंबरला याची मुदत संपत असल्याने पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. वायर बदलणे व इतर कामासाठी वेगळा खर्च असल्याचे विभागातील अधिकाऱ्यानी सांगितले. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)अनेक रस्त्यावर अंधारगेल्या तीन वर्षात पथदिव्यावर ४० कोटीचा खर्च करण्यात आला. परंतु झिंगाबाई टाकळी मार्ग, तेलंखेडी मार्ग, मानेवाडा रिंगरोड, लालगोदाम मार्ग, तसेच दक्षिण अंबाझरी मार्गावरील रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे.