शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वन्य प्राण्यांमुळे हरभऱ्याच्या पिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : परिसरातील बाभूळखेडा, लाेणखैरी, खापा, चिचाेली, गुमथी, घाेगली शिवारात हरीण व राेही या वन्य प्राण्यांचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : परिसरातील बाभूळखेडा, लाेणखैरी, खापा, चिचाेली, गुमथी, घाेगली शिवारात हरीण व राेही या वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. या प्राण्यांनी हरभऱ्याच्या पिकाची प्रचंड नासाडी केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा कायम बंदाेबस्त करावा, तसेच पिकाची याेग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मागील काही वर्षांपासून असून, त्यांची संख्या वाढत असल्याने नुकसानाचे प्रमाणही वाढत चालले आहे. याच प्राण्यांनी दाेन महिन्यांपूर्वी याच भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व तुरीच्या पिकाचे माेठे नुकसान केले हाेते. या नुकसानाच्या शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने वन कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून संबंधितांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले; परंतु अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही, अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

याच वन्य प्राण्यांनी आता हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास वन्य प्राणाी हिसकावून घेत असल्याने त्यांचा वन विभागाने कायमचा बंदाेबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सविता जिचकार यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.